Childhood of Chhatrapati Shivaji Maharaj in Marathi Short Stories by DS The Writer books and stories PDF | छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण

Featured Books
  • خواہش

    محبت کی چادر جوان کلیاں محبت کی چادر میں لپٹی ہوئی نکلی ہیں۔...

  • Akhir Kun

                  Hello dear readers please follow me on Instagr...

  • وقت

    وقت برف کا گھنا بادل جلد ہی منتشر ہو جائے گا۔ سورج یہاں نہیں...

  • افسوس باب 1

    افسوسپیش لفظ:زندگی کے سفر میں بعض لمحے ایسے آتے ہیں جو ایک پ...

  • کیا آپ جھانک رہے ہیں؟

    مجھے نہیں معلوم کیوں   پتہ نہیں ان دنوں حکومت کیوں پریش...

Categories
Share

छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण

छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण

राजांनी पुण्याची जहागीर राजमाता जिजाऊ यांच्या स्वाधीन केली.

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज कुशल अधिकाऱ्यांसह पुण्यात आले.

निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या सततच्या हितसंबंधांमुळे पुण्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती.

अशा प्रतिकूल परिस्थितीत राजमाता जिजाऊ यांनी दादोजी कोंडदेव यांच्यासमवेत पुणे शहराचा पुनर्विकास केला.

राजमाता जिजाऊ यांनी सोन्याच्या नांगराने पुण्यातील शेतजमीन नांगरली, आणि पुणे शहराला पुन्हा पहिले सारखं केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी राजमाता जिजाऊवर होती.
राणी सकवारबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न सकवारबाई सोबत जानेवारी 1657 मध्ये झाले.

काशीबाईसाहेब भोसले ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सातव्या पत्नी आहे.

काशीबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह 8 एप्रिल1657 रोजी झाला.

गुणवंताबाई भोसले ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठव्या पत्नी आहे.

गुणवंताबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह 15 एप्रिल 1657 रोजी झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्र मध्ये कोणाला माहिती नसेल असे क्वचितच लोक असतील.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मराठी मध्ये जाणून वाचण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

स्वराज्याची पहिली मोहीम
छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1647 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या तोरणा गड जिंकला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हटले जाते.

त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा उर्फ सिंहगड आणि पुरंदर किल्ला आपल्या ताब्यात घेऊन पुणे प्रांतावर पूर्णपणे आपले नियंत्रण मिळवले.

तोरणा गडावर छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्तधन सापडले व त्या गुप्त धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला बांधण्यात केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य वाढत असल्यामुळे आदिलशहाने त्यांना आळा घालण्यासाठी शहाजीराजांना अटक केली.

आदिलशाहीने फतेखान नावाच्या सरदाराला 5000 सैन्यासोबत पाठवून छत्रपती शिवाजी महाराजांना आळा घालण्यासाठी पाठवले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी फते खानाचा पराभव पुरंदर किल्ल्यावर केला.

बाजी पासलकर यांनी फत्तेखानाचा पाठलाग करत सासवड पर्यंत आले आणि सासवडच्या लढाईत बाजी पासलकर यांना मरण आले.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा
छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले तेव्हा त्यांनी स्वतःची राजमुद्रा तयार केली.

शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांची मुद्रा पारशी भाषेत होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत मध्ये आहे.

या राजमुद्रा वरील मजकूर खालील प्रमाणे आहे.

“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”

छत्रपती शिवाजी महाराज
याचा असा अर्थ होतो की ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो तसेच शहाजी महाराजांचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचीही राजमुद्रा व तिचा लौकिक वाढतच जाईल.

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक (Chatrapati Shivaji Maharaj Coronation)
शिवाजी महाराज यांनी आपल्या अनेक मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळविली होती, परंतु औपचारिक पदवी नसतानाही, ते तांत्रिकदृष्ट्या मुघल जमिनदार किंवा विजापुरी जहागीरदाराचा बंडखोर मुलगा म्हणून ओळखल्या जात होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तविक राज्य करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नव्हता.

जर छत्रपती शिवाजी महाराज राजे म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला असता तर दुसऱ्या मराठी राजांना आणि मुस्लिम शासकांना सुद्धा त्यांचा हुकुम म्हणावा लागला असता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी 1673 मध्ये सुरू झाली परंतु काही वादग्रस्त समस्यांमुळे राज्याभिषेक ला जवळजवळ 1 वर्ष उशीर झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये ब्राह्मण लोकांमध्ये वाद निर्माण झाला.

दरबारातील ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला याचे कारण म्हणजे हा दर्जा फक्त हिंदू समाजातील क्षत्रिय वर्णासाठी राखीव होता.

प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे फक्त क्षत्रिय धर्मातील व्यक्तीचा राजा म्हणून राज्याभिषेक केला जाऊ शकते आणि फक्त क्षत्रिय धर्मातील लोक हिंदू धर्माचे राजा म्हणून ओळखले जाऊ शकते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले कुळ हे क्षत्रिय म्हणून मानले जात नव्हते आणि ते ब्राह्मण ही नव्हते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अधिकृतपणे व्हावा म्हणून त्यांना क्षत्रिय जाहीर केले तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली.

शूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी अडथळा आणणारे लोकांची तोंडे बंद करणे फार गरजेचे होते म्हणून अश्या पंडितांची गरज होती की जे राज्याभिषेक होण्यास मदत करेल.

विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही स्वराज्याची गरज पूर्ण झाली.

या पंडिताला गागाभट्ट नावाने मोठ्या प्रमाणात ओळखले जायचे.

ते त्याकाळी ब्रह्मदेव वा व्यास म्हणून काशीक्षेत्री फार प्रसिद्ध होते.

सुरवातीला काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले.