हुंडा देवूच नये?
*हुंडा देवूच नये. हुंडाबळी प्रकरणं घडणार नाहीत. परंतु आपण आपल्या मुलीचा संसार व्यवस्थित चालावा म्हणून हुंडा तिला मदत म्हणून देत असतो आणि आपण आपल्याच हातानं तिला हुंडाबळीच्या डोहात ढकलत असतो. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.* एक हुंडाबळी प्रकरण. वैष्णवी शशांक हगवणे या महिलेचा हुंड्यासाठी बळी घेण्यात आला. म्हणतात की तिचं प्रेम होतं शंशाकवर. म्हणूनच तिच्या वडिलांनी तिची इच्छा गृहीत धरुन तिचा विवाह करुन दिला. विवाह करतांना हुंडा म्हणून त्यांनी ५१ तोळे सोनं व एक फॉर्च्युनर कार, चांदीची गौराई दिली. त्यानंतर विवाह झाला व विवाह झाल्यानंतर तो व्यक्ती दोन कोटी रुपये मागत होता आणि ते मिळत नसल्यानं सासरकडील व्यक्ती त्यांच्यावर अत्याचार करीत होते. वैष्णवी मरण पावली नव्हे तर मारली गेली. त्यानंतर शवविच्छेदन अहवाल आला. त्या अहवालात वैष्णवीला तिच्या पतीनं व सासरच्या काही लोकांनी तिला पाईपनं मारल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर ती मरण पावताच सासरकडील काही लोकं फरार झालेत. वैष्णवी हगवणे मृत झाली. तिच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी सांगितलं की तिनं प्रेमविवाह केला होता व मी स्वखुशीनं त्यांना गाडी व इतर वस्तू दिल्या. हे जरी वैष्णवीच्या वडिलांनी स्वखुशीनं केलं असलं तरी इथंच चुकलं. गाडी, एक्कावन तोळे सोने, चांदीची गौराई. यासारख्या महागड्या वस्तू पाहून हगवणे प्रकरणात हगवणे परिवारांना लोभ सुटला असेल व ठरवलं असेल की जो व्यक्ती एक्कावन तोळे सोनं देवू शकतो. महागडी कार देवू शकतो. चांदीची गौराई देवू शकतो. त्या व्यक्तीकडे भरपूर संपत्ती असेल व त्याला आता आपण कितीही पैसा मागितला तर तो देईलच. असा विचार करुन त्यांनी लागलीच दोन कोटी रुपये मागितले. जी रक्कम देणं म्हणजे कस्पटेंकडे आव्हानच असेल. कारण विवाह करतांना वधू पक्षांना काय काय करावं लागतःमं ते त्यांचं त्यांनाच माहीत असतं. ते प्रसंगी कर्ज काढत असतात. कारण त्यांच्यापुढं लक्ष असतं त्यांचं बाळ. त्यांना त्या बाळाची खुशी करणं महत्वाचं वाटतं. म्हणूनच वधुपिते विवाहात लाखो रुपये खर्च करीत असतात. वरपित्यांनाही तसंच वाटतं. म्हणूनच तेही खर्च करतातच. शिवाय ते वधुपित्यांना आवर्जून सांगतात की त्यांनी अमूक अमूक करावं. माझे पाहुणे निराश होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि तशी कमतरता आढळू नये. वरपित्यांनी सांगितलेल्या वधुपित्यांना सूचना. आपली मुलगी सुखी रासावी म्हणूनच ते सर्व सूचनांचं पालन करीत असतात. ते विवाह असा थाटामाटात करतात की त्यात कोणताच कमीपणा ठेवत नाहीत. प्रसंगी कर्ज काढतात आणि जे कर्ज काढतात, ते कर्जही वरपित्यांना सांगत नाहीत. केवळ आपल्या बाळाची खुशी व आपल्या बाळाची काळजी. त्या बाळाला सासरी एवढासाही त्रास होवू नये. परंतु पुढं त्यात समस्या निर्माण होते. समस्या अशी असते की विवाह झाल्यानंतर लोभ सुटतो वरपित्यांना. मग ज्या गोष्टी करु नये, त्या गोष्टी वरपिते करतात. वैष्णवीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास हगवणे परिवारानंही तेच केलं. जो इतर वरपिता करतो. त्यालाही लोभ सुटला, जो इतर वरपित्यांना सुटतो. ज्यातून वैष्णवीची हत्या करण्याचं धाडस हगवणे परिवारानं केलं. खुशी...... बाळाची खुशी...... साऱ्याच वधुपित्यांना वाटत असते की आपल्याही बाळाची खुशी व्हावी. तिला सासरी त्रास होवू नये. म्हणूनच एक्कावन तोळे सोने, चांदीची गौराई व महागडी गाडी देण्यासारख्या गोष्टी वधुपिते करीत असतात. ते हुंडा म्हणून ती रक्कम दःत नाहीत, तर आपल्याच मुलीला तिच्या संसारात त्या गोष्टीचा वा रकमेचा आधार होईल या हेतूनं वधुपिते त्या वस्तू देत असतात. हा हुंडा नसतोच. तर एक मदत असते. टरंतु त्या मदतीचा गैरफायदा घेत काही हगवणेसारखे वरपक्ष त्या गोष्टीचा नाजायज आपल्या स्वार्थासाठी फायदा घेतात. त्यापेक्षा तशा प्रकारच्या रकमा वडिलांनी दिल्यात नाही तर कदाचीत हुंडाबळीच्या समस्यांवर अःकुश तरी थोड्या प्रमाणात लावता येवू शकतो. शिवाय विवाह करतांना वधुपित्यानं भिवून नाही तर ठासून सांगायला हवं की आपण अमूक अमूक गोष्टी करीत असतात तर माझी मुलगी मागू नका. जो अमूक अमूक गोष्टी मागत असेल तर त्याला माझ्याघरी जागा नाही. तसंच मुलींसाठी जास्त अपेक्षेचा पती शोधून त्यांच्याशी विवाह लावून देवूच नये वधुपित्यांनी. कोणताही व्यक्ती, जो आपल्या मुलींना सुखी ठेवू शकत असेल त्याच मुलाला मुलगी द्यावी. कदाचीत वैष्णवीच्या आईवडिलांनी तिला एखाद्या गरीब मुलाला मुलगी दिली असती व एक्कावन तोळे सोने, महागडी गाडी व गौराई दिली असती तर त्यानं तिला राणी बनवून ठेवलं असतं. कोणताच त्रास दिला नसता. परंतु आजचे वधुपिते तसं करीत नाहीत. तिथंच चुकत असतं. त्यानंतर मागण्यावर मागण्या सुरु होतात. त्यातून मागण्या पुर्ण झाल्या नाहीत तर मग हत्या होत असते. वैष्णवी हगवणे प्रकरण काहीसं असंच आहे. अशीच हुंडा प्रकरणं व हुंड्यातून घडणारी प्रकरणं. काही ठिकाणी हुंडा मागणी होत असेल तर घटस्फोट होतो. मंग आरोप लावले जातात. परंतु हुंडाच दिल्या गेला नाही तर ना हत्या होतील, ना हुंडा दिल्या गेल्याचा आरोप लावता येतील. मात्र हे जरी खरं असलं तरी आज आपण सावधगिरीची भुमिका घेत नाही. जी घेण्याची अतिशय मोठ्या प्रमाणावर गरज आहे. हुंडा देवूही नये व घेवूही नये. तो गुन्हाच आहे. अन् आपण तो गुन्हाच करीत असतो. शिवाय असा गुन्हा आपल्याकडून घडलाच तर त्यावर उपाय नाही. कारण गेलेला जीव हा कधीही परत येवू शकत नाही. हुंड्यातूनही घटस्फोट होत असतात. न्यायालयात चार्जशीटा दाखल होत असतात. आरोपावर आरोप लावले जातात. मग ठरवलं जातं की हुंडा देणं घेणं गुन्हा आहे. आपण तो घेतलाच कसा आणि दिलाच कसा? हे सर्व प्रश्न. हे प्रश्न उमेदवार जीवंत असला तर..... संपल्यावर सारंच संपतं. त्या खटल्याचाही काहीच फायदा नसतो. घटस्फोट...... अलिकडील काळात घटस्फोटाचे खटले वाढत आहेत. हुंडा व खावटी जर सुरु राहिली तर हे प्रमाण आणखी वाढू शकते यात शंका नाही. आज जे कोणते घटस्फोटाचे खटले न्यायालयात सादर होत आहेत. त्यातील शंभर प्रतिशत खटल्यांपैकी बऱ्याचशा खटल्यात हुंडा व खावटी हेच महत्वपुर्ण मुद्दे असतात. बाकीचेही इतरही मुद्दे असतातच. जसे लैंगिक छळ केला. मानसिक त्रास दिला. ही सर्व कारणं असतात. परंतु वास्तविकता वेगळीच असते. वास्तविकता तपासली असता असं आढळून येते की काहीच घडलेलं नाही. जसं हुंडा प्रकरण. हुंडाबळी प्रकरणात हुंडा घेणारा जसा दोषी असतो. तसाच दोषी असतो हुंडा देणारा. हुःडा मागणी होण्यापेक्षा हुंडा देवूच नये. विवाहापुर्वीच कोणी हुंडा जर मागत असेल, तर त्याची रितसर तक्रार आधीच पोलीस स्टेशनला द्यावी. हुंड्याची रक्कम थेट देवू नये. मग स्वखुशीनं का असेना. तशी कायद्यातही तरतूद आहे व कायदेही तेच सांगतात. परंतु आपण कायद्याचं पालनच करीत नाही. त्यानंतर जे घडतं. त्यानं आपल्याला पश्चाताप होतो. तद्नंतर त्यावर उपाय नसतोच. हुंडा देणे घेणे यावर बंदीचा हा कायदा असतांना लोकं कोणी हुंडा मागितल्यावर थेट रक्कम हुंडा म्हणून देत असतात. त्यानंतर लोभ सुटतो व जशी लोभात हानी होते असं म्हणतात, त्याप्रमाणे आणखी रक्कम त्यांना माहेरकडून हवी असते. ज्यात वाद होत असतात. ज्यातून कलह निर्माण होतो व जीव जातो. त्यामुळंच वधू पक्षानं हुंडा प्रकरणातही सावधान झालेलं बरं. हुंडा जर कोणता वरपक्ष विवाहापुर्वीच मागत असेल तर विवाहापुर्वीच असा विवाह करु नये. अशा घरी कोणीच मुलगी देवू नये. ज्यातून मुलीला त्रास होईल व त्यातून घटस्फोट होईल वा आपल्या मुलीचा जीव जाईल. एकंदरीत शहानिशा व विचार केल्यास हुंडा पद्धतीवर दोषी हुंडा मागणारे जसे असतात. तसेच दोषी असतात हुंडा देणारेही. खरं तर हुंडा देवूच नये. तशी प्रतिज्ञाच करावी वधूपक्षानं. अन् कोणी हुंडा मागत असल्यास त्याला सोडूच नये. हे कार्य विवाहापुर्वी करावं. विवाहानंतर नको. आपण जर असेच वागलो, वागत राहिलो, तर त्यामुळं आपल्यावर पुढं पश्चातापाची वेळ येणार नाही व आपल्या मुलीचा संसारही व्यवस्थित राहू शकेल.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०