यामागच्या भागात आपण पाहिलं :
भास्करने एका मुलीच्या अंगावर गाडी घालता घालता राहिली होती.... तो त्या मुलीची माफी मागतो आणि तिथून निघून जातो ....
आत्ता पुढे :
ठिकाण - ऋग्वेदचे घर
ऋग्वेद एका अपार्टमेंट मध्ये भाड्याने राहत होता... त्याचा फ्लॅट 3 bhk होता, त्यात ऐकूण 6 मुले शेअर बेसिस वरती राहत होती ....
तो ऋग्वेदच्या फ्लॅट ची बेल वाजवतो .... ऋग्वेद दार उघडतो ....
भास्कर आत येतो ....
ऋग्वेद : कसं काय येणं केलं ... असा का बॅग घेऊन आला आहेस ??? जसं काय घर सोडून आला आहेस ...
भास्कर : हो ... मी घर सोडून आलोय !!!!
ऋग्वेद: काय ????😲😲😲 पण का ??? काय झालंय भास्कर....
भास्कर: नंतर सांगतो... आधी पाणी आणि काहीतरी खायला घेऊन ये .... मला खूप भूक लागली आहे ....
ऋग्वेद : हो... आणतो थांब
(तो पाणी आणि त्याला खायला सकाळी आलेला त्याचा जेवणाचा डबा त्यातलं जेवण त्याला वाढून घेऊन येतो .... भास्कर शांतपणे जेवण करतो )
ऋग्वेद : आता तुझ जेवण झालं ... सांग मला काय झालं ... का अस घर सोडून आला आहेस ....
भास्कर : hmm ... सांगतो तर झाल असं की सकाळी मला आबासाहेबांनी बोलावलं ....
फ्लॅशबॅक :
भास्कर सकाळी जिम मधून आल्यावर त्यांच्या घरातल्या
एका नोकर त्याच्या बेडरूम मध्ये येऊन त्याला सांगितलं की आबासाहेबांनी निरोप दिला आहे .... तुम्हाला खाली हॉल मध्ये बोलवलं .... तो कपडे बदलून त्यांच्या हॉल मध्ये जातो....
भास्कर :बाबा तुम्ही आम्हाला बोलवलं.... काय झालं ???
आबासाहेब : हो ... बसा चिरंजीव आम्हाला तुम्हाला काही सांगायचं आहे....
भास्कर : बोला ना बाबा , तुम्ही आम्हाला का बोलवलं...
त्याने बसत प्रश्न विचारला ...
आबासाहेब : चिरंजीव ... तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या मुलीचं मंजिरीचं स्थळ आलय त्याच्या बदल्यात ते तुम्हाला येत्या आमदारकीच तिकीट देणार आहेत .... आणि आम्ही त्यांना होकार देणार आहोत....
भास्कर : काय.... बाबा हे काय बोलताय आपण तुम्हाला चांगलचं माहीत आहे... आम्हाला राजकारणात काडीचाही रस नाही.... तुम्ही काय आमचा सौदा करायचं ठरवलं आहे का तुम्ही ... त्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीचं लग्न आमच्याशी लावून सत्ता मिळवण्याचं स्वप्न तुम्ही पाहूच कसं शकता ....
आबासाहेब: चिरंजीव... आपण अति बोलताय आता आम्ही ऐकून घेत आहोत ... म्हणून काहीही ऐकून घेणार नाही...
आजीसाहेब : भास्कर... या घरात आम्ही म्हणू तेच होत या पुढे ही आम्ही म्हणू तसचं होईल.... तुमचं आणि मंजिरीचं लग्न होणार ....
भास्कर: नाही मी नाही करणार हे लग्न .... मला नाही यायचं त्या घाणेरड्या राजकारणात...
सुवासिनी : भास्कर, तू कोणाशी बोलत आहेस याच भान ठेव .... आजी आहेत त्या तुझ्या , तुझ्या भल्याच सांगत आहेत ऐकून घे ना ....
भास्कर:आई तुला चांगल माहिती आहे राजकारण मला आवडत नाही.... तरी ही हे सर्व जण का माझ्या मागे लागले आहेत ....
काकी : अरे भास्कर त्यांचं ऐकून तरी घे .... अस बोलतात का ... तुला कायम स्वतःची मनमानी करायची असते का .... मोठे सांगतात ते आपण निमूटपणे ऐकावं... पण नाही तू कधी मोठ्यांच ऐकत नाहीस ....
भास्कर : तुमचा मुलगा ऐकतो ना मग बास ना .... त्याच्या आयुष्याची राखरांगोळी झाली ठेवली ...आता माझी करण्याचा प्रयत्न करत आहात ...
सुवासिनी : भास्कर... हे काय बोलतो आहेस तू जरा शब्द जपून वापर... काकी आहेत तुझ्या
भास्कर : काकी आहेत म्हणून च शांतपणे बोललो मी ... मी आणि बाबा बोलत असताना मध्येच याचं काय काम ... ते काय बोलायचं ते बोलु दे पण या का बोलता येत.... त्यांना शांत बसा म्हणावं सगळ्यात काय स्वतःचं तोंड घालायचं असत त्यांना ....
आबासाहेब : भास्कर, तूम्ही या लग्नाला तयार व्हा .... आमची तुमच्या कडून ही एकमेव इच्छा आहे ती पूर्ण करा....
भास्कर : तुम्ही आमच्या कडून दुसर काहीही मागा पण हे नाही देऊ शकत तुम्हाला.... माझ्या आयुष्याची माती मी स्वतःच्या हाताने करू शकत नाही....
आबासाहेब: म्हणजे आम्ही तुमच्या आयुष्याची माती करतोय , अस वाटतंय का तुम्हाला.... उलट हे लग्न केलत तर जीवनाचं सार्थक होईल तुमच्या .....
मंजिरी दिसायला अतिशय सुंदर आहेत , तुम्हाला शोभेल अशा.... म्हणून सांगतोय एकदा तरी मुलीचा फोटो पहा आणि मग ठरवा ....
भास्कर: हे आमचं वय आहे का लग्नाचं फक्त २५ वर्षाचे आहोत आम्ही.... आम्हाला हे लग्न करायचं नाही ..... मला स्वतःला सिद्ध करायचे आहे त्यानंतर च मी लग्न करेन......
आजीसाहेब : ते काही नाही... उद्या तुमच्या लग्नाची सुपारी फोडायची .... या घरात आम्ही म्हणू तेच होत स्वतः ची मनमानी कारभार इथे चालत नाही....
इथे राहायचं असेल तर आम्ही जे सांगू तेच करायचं....
भास्कर : मला या घरात राहायचंच नाही मग.... आम्ही पण तुमचेच नातू आहोत तुम्ही हट्टी असाल तर मी पण डबल हट्टी आहे....
( तर हा असा वाद झाला आणि तो वाढतं गेला... म्हणून त्याने हे घर सोडलं...)
ऋग्वेद : म्हणजे तू घरातून भांडण करुन आला आहेस...
भास्कर: हममम... हो आणि आता मी इथे काही दिवस राहणार आहे...
ऋग्वेद : या घरात already ६ जण रहातात पण तू ही राहू शकतोस ... आपण तुला राहण्याचे ठिकाण शोधू ....
भास्कर: ओके...
तिकडे.... स्थळ : मालतीदेवी मेडिकल कॉलेज, राजारामपुरी, कोल्हापूर .
"श्रीजा कसा झाला accident.... तुला काही झालं नाही ना...
श्रीजा : एक मुलगा जोरात गाडी चालवत आला आणि त्याची गाडी माझ्या अंगावर जाता जाता राहिली.... मला काही झालं नाही फक्त माझा फोन फुटला ग अनुश्री.... आणि मला कॉलेज मध्ये यायला खूप लेट झाला ...
अनुश्री : मग तू त्याच्या कडून पैसे घ्यायला हवे होते ....
त्याच्यामुळे तुझा फोन फुटला...
श्रीजा : तो देत होता ... पण मी घेतले नाहीत ....
अनुश्री: का नाही घेतलेस मी असते तर चांगले पैसे घेऊन लुटलं असत त्याला ....
श्रीजा : हो .... माहिती ये मला ते ... आता आपण क्लास मध्ये जाऊया ... नाहीतर हे ही लेक्चर मिस होईल माझं..
चल पटकन...
तर ही आहे आपल्या कथेची नायिका श्रीजा वसंत देशमुख .... ही MBBS college मध्ये फर्स्ट इयरला शिकत आहे ....
आई मधुरा देशमुख आणि वडील वसंत देशमुख हे पेशाने शिक्षक होते .... ती दहावीत असताना तिचे आई बाबा एका कार accident मध्ये ते दोघे ही वारलेले होते.... घरात ती आणि तिची आजी या दोघीचं राहत असतात.... घरात कशाची तरीही कमी नव्हतीच... ते वारल्या मुळे त्यांची पेन्शन तिला मिळत होती ... त्याचं बरोबर त्यांची शेती ही बऱ्यापैकी होती , त्यामुळे ती जे मागेल ते मिळतं होत ....
श्रीजा चे आयुष्य एकदम सिंपल होत ... पण लवकरच एक वादळ तिच्या आयुष्यात येणार होत ....🌪️🌪️🌪️
पुढे काय होणार यासाठी वाचत रहा .... मर्यादा एक प्रेमकथा 💗💗💗
कथा आवडल्यास नक्की रेटिंग आणि कमेंट्स करायला विसरू नका ....
.
.
.
Bye bye stay tuned ❤️❤️❤️