Thank you in Marathi Thriller by Balkrishna Rane books and stories PDF | कृतांत

Featured Books
Categories
Share

कृतांत

कृतांत (भाग १)शके १४६०सगळीकडे निरव शांतता होती. काळोख साऱ्या जगावर अधिराज्य गाजवत होता. अश्यावेळी एका घनदाट जंगलात झाडांच्या गर्दीत मशालींच्या पिवळ्या प्रकाशात काही गुप्त हालचाली सुरू होत्या. काळा वेष परिधान केलेले आठजण  वर्तुळाकार बसले होते. मध्यभागी लाकडाची धूनी पेटवली होती.ओबड धोबड विचीत्र अश्या दगडी मुर्त्यांच्यी मांडणीकेली होती. काही मानवी खोपड्यांमध्ये कसलातरी द्रव भरून ठेवला होता.धूनीच्या बाजूला एका दगडावर एक जिवंत घुबड बसलं होत. मशालींच्या पिवळ्या प्रकाशात त्याचे निळसर - हिरवट डोळे चकाकत होते.ते घुबड एकदम निच्छल बसले होते. धुनीच्या पलीकडे जमिनीवर एका शव ठेवले होते.काही प्रहरांपूर्वी तो मृत झाला होता. त्याला ठेवलेल्या जमिनी भोवताली वटवाघूळच्या रक्ताने विविध चिन्हे व मंत्र लिहिले होते.एवढ्यात एक अत्यंत हडकुळा इसम काळे कपडे परिधान करून वर्तुळाच्या आत आला. आठहीजन खाली झुकले. बहुधा तो त्यांच्या प्रमुख असावा. त्याने सर्वांकडे बघत उजवा हात वर केला व मंत्र पुटपुटत घुमू लागला.त्याचे पीचपीचे डोळे आणखीनच बारीक झाले.त्याचे शरीर हवा भरल्यासारखे थरथरत होते.थोड्या वेळाने तो झटका बसल्यासारखा झपकन थांबला. सर्वांकडे बघून तो म्हणाला.........." आज आपण तंत्र साधनेतला...एक आगळा प्रयोग करणार आहोत.आजपर्यंत कुणाही तांत्रिकाला जे शक्य झालं नाही ते आपण करणार आहोत.समोर असलेल्या शवामध्ये प्राणाची पुन्हा स्थापना करणार आहोत. आज अमावस्या आहे.नवग्रह एकच रेषेत आहेत.असा योग पुन्हा एक हजार वर्षाने येणार आहे. आज रात्री दुसऱ्या प्रहराच्या दुसऱ्या घटिकेला हा विलक्षण मुहूर्त आहे. त्या देहात आपण असीम शक्ती भरणार आहोत.एकच वेळी असंख्य योध्यांशी लडू शकेल...तंत्र मंत्र...आयुधे यांचा त्याच्यावर परिणाम होणार नाही.आपला शाक्त पंथ साऱ्या भरतवर्षात पसरलाय.इथले सम्राट चित्रवर्मन... प्रधान प्रयागसेन...सेनापती रुद्र्राज आपल्या हातातले बाहुले बनलेयत. आता या शवात प्राण फुंकून व त्याच्यात अमर्याद शक्ती भरून त्याच्या योगाने आपण भरतवर्षातचनव्हे तर संपूर्ण जगावर राज्य करणार आहोत." तो हाडकुळ तांत्रिक विचीत्र हसला व अचानक शांत झाला.खोपडीतल हिरवट रसायन त्याने प्राशन केल व ते इतर तांत्रिकांना क्रमाने प्यायला दिल.हे झाल्यावर अग्निधर धुनी समोर बसला..व डोळे  मिटून मंत्र पुटपुटला लागला.    --------*----------*----------*---याच दरम्यान दहा बारा सैनिक हातात नंग्या तलवारी घेऊन त्या घनदाट जंगलात शिरले होते.पावलांचा जराही आवाज न होऊ देता ते काळोखात व्यवस्थित चालत होते.त्यांचे डोळे अंधारातही वाटेतल्या अडचणी टिपत होते.कोणत्याही संकटाला अन् परिस्थितीला तोंड देण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले गेले होते.वेदना... हाल...उपासमार सहन करण्याची त्यांची क्षमता अफाट होती.हुकुमप्रमाणे दिलेले काम पूर्ण केल्याशिवाय ते माघारी फिरत नसतं.सर्वात पुढे त्यांचा नायक चालला होता.पाठीला बाणाचा भाता...खांद्याला धनुष्य...हाती तळपती तलवार.तो अत्यंत सावध होता.दूरवरून मशालिंचा प्रकाश दिसला तस् त्याने सर्वांना हात वर करून थांबवलं." हे बघा आपण एका महत्वाच्या कामगिरीवर आलोत.कोणत्याही परिस्थितीत काम फत्ते झालेच पाहिजे. तंत्रिकांनी आपल राज्य ताब्यात घेतलं आहे.सगळीकडे अनाचार... व गोंधळ माजला आहे.राजा..प्रधान व सेनापती   तंत्र- मंत्र व जादूटोणा यात गुंतले आहेत. स्वतच्या कर्तुत्वावर त्यांचा विश्वास नाही. दुपारीच मला बातमी कळलिय की बाबा अग्निधर यांनी स्मशानातील एक प्रेत पळवून आणलय.ते त्याला पुन्हा जिवंत करणार आहेत.हे सगळं त्या निसर्गाच्या विरुद्ध आहे.शिवाय ज्याच प्रेत आणलय तो एक दुष्ट ..क्रूर असा दरोडेखोर ' कृतांत ' आहे.आजपर्यंत त्याने किमान दोनशेच्या वर निष्पाप माणसांचे प्राण घेतलेयत. अश्या या ' कृतांत 'दरोडेखोराला पुन्हा जिवंत केल्यास मोठा गोंधळ माजेल."म्हणूनच अग्निधराचा प्रयोग हाणून पडला पाहिजे.जर हा प्रयोग यशस्वी झाला तर काहीतरी अघटित घडेल...भयानक असा गोंधळ  उडेल. आपल्या हातून एकही तांत्रिक सुटता कामा नये.तुम्ही इतर तंत्रिकांना उडवा मी बाबा अग्निधरांचा समाचार घेतो. जराही चाहूल लागू देवू नका. तंत्रिकाना..भूत ..पिशाच्च...वेताळ... वशीभूत असतात. यासाठीच तुमच्या सर्वांच्या गळ्यात   रघुराजमुनी यांनी दिलेले ताईत बांधले आहेत. चला तर.."बोलणारा आयुष हा वीस वर्षांचा तरुण होता. ' मैत्रेय 'नावाची गुप्त संघटना त्याने स्थापन केली होती. चंद्रगड साम्राज्याची झालेली अवस्था बघून तो पेटून उठला होता.आपल्यासारख्या अनेक तरुणांना त्याने युद्ध साठी प्रशिक्षित केलं होत.तंत्रिकाच्या ताब्यात गेलेल्या राज्याला वाचवण्याची त्याने प्रतिज्ञा केली होती.तो स्वतः अनेक कलात पारंगत होता.अनेक शास्त्रांच अध्ययन त्याने केलं होत. आयुषच्या इशाऱ्यावर सारे जण पांगले व हळूहळू पुढे सरकू लागले.      नजरेच्या टप्प्यात आलेले दृश्य ते डोळे विस्फारून पाहू लागले.बाबा अग्निधरांनी सर्वांच्या डोक्याला .स्मशानातील राख फसली. आपल्या सर्वांगाला राख फासून ते धूनिच्या समोर बसून विशिष्ट स्वरात मंत्र म्हणत होते.मंत्रातले शब्द पिशाच्च भाषेत होते.त्यापाठोपाठ आठही जण तोच मंत्र म्हणत होते ..त्याची आवर्तने करत होते .सुरुवातीला त्यांचा आवाज धिमा होता पण हळूहळू लय वाढत गेली..हातातली मंतरलेली स्मशानराख बाबा अग्निधर समोरच्या प्रेतावर टाकत होते.आता मंत्रोच्चार वरच्या टिपेला पोहचला.अचानक वातावरणात बदल झाला.हवेत विचीत्र कंपन जाणवू लागली.सर्व तंत्रिका चा आवाज साऱ्या परिसरात कंपन निर्माण करत घुमू लागला. दुसऱ्या प्रहराची दुसरी घटिका पूर्ण होण्यासाठी काही पळ अजून शिल्लक होते.आणि ते जगावेगळे अघटीत घडले.समोरचे प्रेत अचानक कंप पावू लागले. सुक्ष्म थरथर त्या निष्प्राण देहात सुरू झाली.पण त्या तंत्रिकांचे तिकडे लक्ष नव्हते.. डोळे मिटून ते जोराने मंत्र म्हणत होते.आता ते प्रेत थडथडू लागले.  त्या क्षणी आयुषने हात वर केला. त्याचे सहकारी विजेच्या वेगाने पुढे सरकले. आयुषने बाण  धनुष्यावर चढवला व चपळाईने बाण सोडला.बाणाने अग्निधराच्या गळ्याचा वेध घेतला.मंत्राच्या शेवटच्या कडव्याच्या शेवटच्या ओळीच्या मध्यावर अग्निधर पोहचला होता.ते शव अर्धवट उठून बसले होते. बाण गळ्यात घुसलेला अग्निधर त्या अर्धवट जिवंत झालेल्या..'  कृतांत ' शेजारीच कोसळला. त्याचे ओठ हलत होते पण शब्द बाहेर पडत नव्हते.आयुषच्या सहकाऱ्यांनी आठही तांत्रिकांची डोकी उडवली. अचानक हल्ला झाल्यामुळे कुणीही विरोध करू शकला नाही.सगळीकडे रक्ताचे थारोळे पडले होते. जमिनीवर काढलेल्या आकृत्या ...लिहिलेले मंत्र..झोपड्यांमध्ये ठेवलेला तो विचीत्र द्रव...तो हिरमुस वास...हे सगळं बघून आयुषच्या अंगावर काटा आला.त्याचे लक्ष अग्निधराच्या हाता कडे गेलं. मरता- मरता त्याने बोटांनी जमिनीवर गीचामिड अक्षरात काहीतरी लिहिले होते. आयुषने ते वाचले ' आम्ही  सगळे परत येऊ.'हे वाचून तो विचारात पडला.  कृतांत उठून उभा राहण्याची धडपड करत होता." पेटवून टाका सगळ " आयुष ओरडला. सैनिकांनी तिथल्या मशालीनी सारा परिसर पेट्वला.आगीचा भडका उडाला.बाहेर पळताना आयुषने आपली तळपती तलवार म्यानातून बाहेर काढली व कृतांताच्या छातीत खुपसली. आग वेगाने फैलावली होती.आगीच्या ज्वाळांनी जंगलाचा परीसर उजळून गेला होता. सारे मैत्रय हे ..बाहेरून पाहत होते एवढ्यात एक घुबड चित्कारत बाहेर उडाले व अंधारात दिसेनासं झालं. कुठून तरी कोल्ह्यांनी जोरात ओरडायला सुरूवात  केली. रातकिड्यांची किरकिर...तार स्वरात सुरू झाली.वातावरणातला भयानकपणा वाढला होता." चला आता आपल लक्ष..राज्य शाक्तांच्या ताब्यातून हस्तगत करण्याकडे लावूया. लवकरच हे ध्येय पण आपण साध्य करू.आज आपण प्रजेच्या एका शत्रूला...शाक्तपंथीच्या प्रमुखाला संपवलय. " आयुषच बोलणं संपतो न संपतो तो आसमंतात भयानक हसण्याचा आवाज गर्जत असल्याचे त्यांना वाटल.पण त्या कडे दुर्लक्ष करत ते माघारी  फिरले. आगीमुळे बरीच झाड पेट घेत खाली कोसळत होती.त्या ज्वाळांच्या सभोवताली  अनेक  चित्र _ विचित्र  निळसर हिरव्या आकृत्या फेर धरून नाचत होत्या. कुणीतरी जोराने हुंकारत व गर्जत होत.दूरवर धुबड चित्कारत होत....पान सळसळतं  होती." आम्ही  सारे परत येवू " अस सार जंगल कुजबुजत असल्याचा भास आयुष्य झाला. पण तो शूर..साहसी तरूण बेडरपणे आपल्या मार्गावर चालत राहिला.यापुढे अशा अनेक संकटातून आपल्याला मार्ग काढायचा आहे हे तो मनाला पटवत राहिला.-----*-----*-----*-----*-----मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर एक रिफायनरी प्रकल्प निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.प्रत्यक्षात हा जंगली भाग होता. झाड तोडून काही भाग मोकळा  केल्यावर खोदकाम सुरू झाल. दुसर्याच दिवशी त्या ठिकाणी एका राजवाड्यांचे  अवशेष सापडले.कोरीव खांब .....दगडी दरवाजे..पक्क्या विटांच बांधकाम...भांडी व पंचधातूंच्या विचित्र  आकाराच्या वस्तू त्या ठिकाणी  आढळून आल्या.  त्वरीत खोदकाम थांबवण्यात आल. या जागेचा ताबा  पुरातत्व विभागाने घेतला. पुन्हा  उत्खनन सुरू झाल. मिळालेल्या वस्तू  साठवण्यासाठी एक कच्च गोदाम बांधण्यात आलडाॅ गोपाल शर्मा यांच्या  मार्गदर्शनाखाली दहा जणांची  एक टिम काम करत होती. त्या अवशेषांच निरीक्षण केल्यावर ते अवशेष पंधराव्या शतकातील असावेत असा अंदाज डाॅ.  शर्मांनी वर्तवला. अर्थात कार्बन डेटिंग केल्यावरच निश्चितपणे नेमका काळ कळणार होता.    डाॅ. शर्मा थोडे चिंतित झाले होते. पंचधातूच्या ज्या वस्तू  सापडल्या होत्या  त्यावर काही विचित्र आकृत्या...काही चिन्ह व विचित्र  भाषेत काहीतरी लिहल होत. तसच  कमलपत्रांचा एक गठ्ठा  सापडला होता. त्यावर त्याच अगम्य भाषेत काहि माहिती  लिहिली होती.ही नेमकी कोणती भाषा होती व ती वाचणारा कोणी उपलब्ध  होईल का याची चिंता  त्यांना पडली होती.पण काहीतरी अशुभ घडण्याची त्यांना भिती वाटत होती.या साईट पासून पाच किलोमीटरवर कामगरांना राहण्यासाठी जागा तयार करत होते.त्या ठिकाणी जागा साफ करताना तिथल्या कामगारांना विलक्षण  दृश्य  दिसल.सारे कामगार प्रचंड घाबरले....काही तर थरथर कापू लागले.ते दृश्य होतच तस भितीदायक. समोर  एकूण दहा हाडांचे सांगाडे होते. दहाही सांगाड्याच्या गळ्याकडच्या भागात तीक्ष्ण बाण घुसलेले होते.तर इतर सांगाड्यापेक्षा अधिक लांबीचा व रूंद असा एक सांगाडा होता. त्या सांगाड्याच्या छातीत एक रूंद पात्याची लांब तलवार घुसलेली दिसत होती. त्या तलवारीवर काही चित्र  व लिखाण केलेल होत. महत्वाचे म्हणजे ती तलवार  जराही गंजलेली दिसत नव्हती.डाॅ  शर्माना त्वरीत फोन करण्यात आला.   डाॅ. शर्मा आपल्या जीपने तिथे आले.आल्या - आल्या ते घाईने त्या स्थळी गेले.सगळ्या सांगाड्याच निरीक्षण केल्यावर ते सगळ्यात  मोठ्या दिसणार्या सांगाड्यापाशी थांबले. खाली बसून त्यांनी तलवारीचे निरीक्षण केले. ते चमकले.ते आपल्या सहकार्याला म्हणाले---" मौर्ये ; ह्या तलवारीवर जी चित्रे व लिखाण आहे ते काल सापडलेल्या पंचधातूंच्या वस्तूंवरील लिखाणा प्रमाणेच आहे.ही तलवार खुपच वजनदार आहे."" होय सर, ही तलव् वापरणारा माणेस खुपच ताकदवान असला पाहिजे. " मौर्ये म्हणाला." हा; आणि  हा सांगाडा सुध्दा अति शक्तिशाली पुरूषाच्या असावा....कालचा वाडा आणि  हे सांगाडे यांच्याशी निगडीत काहीतरी कहाणी  असली पाहिजे. " डाॅ. शर्मा  म्हणाले. " सर; तो ...तो..सापळा बघा..त्याच्या डोळ्यांच्या खोबणी आपल्याकडे रोखून बघताहेत अस वाटत."डाॅ. मौर्ये त्या सापळ्याजवळ गेले.अचानक त्यांच लक्ष त्या सांगाड्याच्या लांबसडक बोटांच्या हाडाकडे गेले. त्याच्या डाव्या  हाताजवळ काहीतरी लिहिलेल दिसल." मौर्ये इथ या. तो ब्रश आणा...इथली जागा अलगद साफ करा.इथ काहितरी लिहिलेल दिसतय."मौर्येंनी ती जागा काही काळजीपूर्वक साफ केली. तिथे तिन शब्द  लिहिलेले दिसले." सर; ही भाषा तलवारीवरच्या भाषेपेक्षा वेगळी  आहे."" होय. कदाचित ही पिशाच्श भाषा असावी. चौदाव्या शतकात तंत्र- मंत्र, जादूटोना करणारे लोक ही भाषा वापरत. कदाचित इथे अघोरींचा वावर असावा."डाॅ .गोपाल शर्मा आपल्या तुकतुकीत डोक्यावर हात फिरवत म्हणाले." सर, मला कालपासूनच काहीतरी अघटित घडणार अस वाटतय." मौर्ये म्हणाला. " मौर्ये; तुझी ही पहिलीच साईट आहे.मी माझ्या कारकिर्दीत अश्या अनेक साईट पाहिल्यात. घाबरू नकोस. काही होत नाही. आपल्याला असा एखादा माणूस शोधावा लागेल की जो हे सगळं  लिखिण वाचू शकेल.एखादा हौशी गाढा अभ्यासक...सापडतो का हे हेडक्वार्टरला फोन करून विचार."" सर, ही तलवार  ओढून काढू का?"" नको. पहिल्याने ह्या सगळ्याचे व्हिडिओ  रेकाॅर्डिंग करा. मग हे सगळे  सांगाडे गोदामात हलवा. तिथे तलवार काढा.सगळ्यांच कार्बन डेटिंग कराव लागणार." डाॅ. शर्मांनी सूचना केली.ह्विडिओ रेकाॅर्डरने शूटिंग सुरू केल. मौर्ये सगळ्या सांगाड्यांचे मोजमाप घेवू लागले. हे करत असताना त्यांनी त्याच्यां डोळ्यांच्या खोबण्यांकडे पाहणे टाळले. सगळ्यात मोठ्या सांगाड्याचे मोजमाप घेताना ते चमकले .पावणे सात फूट उंचीचा तो सापळा होता.त्याचे खांदे खूप रूंद  व हात लांब होते." सर; हा माणूस सर्व सामान्य माणसापेक्षा खुपच धडधाकट व अमानुष  ताकद असलेला असावा.अश्या माणसाच्या छातीत तलवार खुपसणारासुध्दा तेवडाच  बलदंड असला पाहिजे. "" नेमक काय घडल होत ते आज कुणीही सांगू शकणार नाही. " डाॅ .गोपाल शर्मा म्हणाले.तेवड्यात  तिथे  त्यांच्याच टिममधली गौरी  अगरवाल तिथे बाईक घेऊन आली." सर ; आत्ताच हेड क्वार्टरवरून फोन आलाय, कुणी राज सरदेसाई नावाचा पुरातन लिपींचा अभ्यासक मुंबईवरून येतोय."" व्वा...छान बातमी आणलीस तू. कधीपर्यंत  येईल हा माणूस?"" परवापर्यंत पोहचेल."" चला..आता काही कोडी सुटतील." डाॅ गोपाल शर्मा सुस्कारत म्हणाले." सर.... आधी त्यांना येवू द्या तर." गौरी म्हणाली.गौरी अगरवाल याच वर्षी पुरातत्व विषयात पधवीधर झाली होती. या वर्षीची ती टाॅपर होती.खुप हुषार होती. नवीन -नवीन गोष्टी  शिकण्याची तिची तळमळ  वादातीत होती.मन लावून तासान-तास ती काम करायची....बिनधास्त....होती.तिला कशाचीच भिती वाटायची नाही.प्रत्यक्ष साईटवर काम करायचा तिचा हा पहिलाच प्रसंग होता.जिथ राजवाडा व त्याचे अवषेष सापडले त्याचा व या सांगाड्याचा काहीतरी संबध असावा अस तिला राहून-राहून वाटत होते.व्हिडिओ रेकाॅर्डिंग पूर्ण झाल्यावर...सांगाडे हलवण्याचे काम सुरू झाले.पण एकही कामगार  पुढे यायला तयार होईना.सारेच भेदरले होते.अखेर डाॅ. शर्मा,मौर्ये  व गौरीने एक -एक सांगाडा उचलून व्हॅनमध्ये ठेवला.सारे सांगाडे गोदामाकडे नेण्यात आले.   हे सगळं समोरच्या  भल्यामोठ्या झाडाच्या ढोलीत बसलेल घुबड आपल्या तीक्ष्ण  व पिचपिच्या डोळ्यांनी न्याहाळत  होत.विचित्र  आवाज  काढत ते मान हलवत होत.ज्यावेळी व्हॅन निघाली तेव्हा  त्या घुबडाने चित्कारत बाहेर झेप घेतली व ते व्हॅन पाठोपाठ निघाले. एका नव्या अराजकतेची...भविष्यात घडणार्या भयानक प्रसंगांच्या मालिकांची ती चाहूल होती.कारण त्या घुबडाच्या  शरीरात  दर पिढी बदलत प्रवेश कलेल्या अघोरी बाबा चक्रधराचा आत्मा गेली पाचशे वर्षे  संधीची वाट बघत बसला होता.आज त्याला आपला हेतू साध्य होण्याचा मार्ग सापडला होता.  इकडे गोदामात  सांगाडे व्यवस्थित ठेवण्यात  आले. प्रत्येक  सांगाड्याच्या  गळ्यातले बाण खेचून काढण्यात आले पण सर्वात मोठ्या सांगाड्याच्या बरगड्यात घुसलेली तलवार काढताना मात्र  तिघांना खुपच कष्ट करावे लागले. ज्या क्षणी तलवार काढली गेली त्याच क्षणी गोदामाच्या छतावर बसलेले घुबड कर्कश आवाजात  ओरडले. त्यावेळी मौर्ये व इतर कामगारांच्या अंगावर  काटा उभा राहिला. गोदामाला कुलूप लावून चावी रखवालदाराच्या ताब्यात  देवून तिघेही आपल्या राहूट्यांकडे वळले तेव्हा सायंकाळ झाली होती..................................कृतांतत्या रात्री राज सरदेसाई  नागपूरला जाणार्या रेल्वेत बसला.नागपूरला उतरून तो पुरातत्व खात्याच्या साईटवर जाणार होता. त्याला डाॅ. गोपाल शर्मा यांच्याकडून लोकेशन टाकण्यात आले होते. चौवीस वर्षांचा हा तरूण निमगोरा, कुरळ्या केसांचा व उत्साही  होता. पण तो थोडा भित्रा होता.मुंबईत विक्रोळी इथे तो राहत होता. बारावीनंतर गंमत म्हणून तो परकिय भाषा शिकला.पण नंतर आवड म्हणून त्याने पुरातन भाषा शिकण्यास सुरूवात केली. मोडी , ब्राम्ही, पाली, अर्धमागाधी, मांडू लिपी,पिशाश्च भाषा, परदेशी जमातींच्या भाषा,काही चित्रलिप्या यांचा त्याने अभ्यास  केला.काही लिप्या ह्या दोन -तीन लिप्यांच्या वापर करून तयार झालेल्या असतात हे त्याच्या लक्षात आल होत.एवड्या कमी वयात त्यान बर्यापैकी यश संपादन केल होत. यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती. मुंबईतील पुरातत्व  खात्याला तो गेली दोन वर्षे तो मदत करत होता.   राज प्रवास करत होता त्यावेळी  मध्यप्रदेशातल्या त्या सीमेवरच्या देवतांग गावातल्या साईटवर काही भयावह गोष्टी  घडत होत्या. रात्री  बारा वाजता छपरावर बसलेले ते घुबड पत्र्याच्या छेडच्या भिंतीना हवा येण्यासाठी  ठेवलेल्या गोलाकार मोकळय् जागेतून आत घुसले. खाली दहा सांगडे ठेवलेले होते.ते घुबड त्या सांगाड्यांच्या   समोर थांबले. त्याचे विखारी हिरवे डोळे चमचमत होते.आसुरी आनंदाने  ते घुबड  चित्कारले.स्वतःभोवती गरगर फिरत त्याने तीन फेर्या पूर्ण  केल्या.अचानक ते घुबड काहितरी पुटपुटू लागले.सुरूवातीला हळू वाटणारा त्याचा आवाज क्षणाक्षणाला वाढू लागला....त्याचे हिरवे डोळे  लालभडक झाले....बुब्बुळ गरगरा फिरू लागली.त्याचे पंख थडथड आवाज करू लागले. अचानक  एक प्रदीर्घ किंकाळी मारत ते जागेवरच कोळसले.क्षणभर सर्वत्र  भिषण शांतता  पसरली.नंतर विलक्षण अशी घटना घडली. खाली ठेवलेल्या दहा सांगाड्यापैकी एक सांगाडा हलकेच उठून उभा राहिला. त्या हाडांच्या  सापळ्याच्या पिचपिच्या खोबणीत लाल प्रकाश भिरभिरू लागला. भिषण हास्य करीत तो सापळा  थयथया नाचू लागला. हे दृश्य एखाद्या  माणसाने बघितले असते तर तो तिथेच गार झाला असता. बाहेर डुलक्या  काढणार्या रखवालदाराला आत काय चाललय याची कल्पनाच नव्हती. तो नाचणारा सापळा खाली निश्चेष्ट पडलेल्या सांगाड्यासमोर उभा राहिला.त्याने जमीनीवर तीन वर्तुळाकार आकृत्या काढल्या त्यात लहान मोठ्या रेघा मारल्या व तो अगम्य  असे मंत्र  पुटपुटत हातवारे करू लागला.काही वेळानेएक -एक सांगाडा  हालचाल करू लागला. मंत्रांची आवर्तने  वाढत गेली तसतसा एक -एक सांगाडा  उठत गेला.फक्त  सर्वात  मोठा सांगाडा अजूनही जमिनीवरच होता.उठलेल्या सांगाड्याकडे बघत तो पहिला सांगाडा म्हणाला...." शिष्यांनो...मी चक्रधर...तांत्रिकाचा गुरू ...गेली पाचशे वर्षे आपण निद्रेत होतो.सार्या हिंदूस्थानवर शाक्तांच आधिपत्य आणण्याच आपल स्वप्न  अखेरच्या क्षणी मैत्रयांनी हाणून पाडल.खर म्हणजे आपण सर्वच कायमच्या काळझोपेत जाणार होतो.पण अखेरच्या क्षणी मी एका घुबडाच्या शरीरात प्रवेश केला.आजवर घुबडांच्या असंख्य पिढ्यातून प्रवास  करत मी स्वतःला जीवंत ठेवलय.आता आपल्याला नव्याने आपली मोहीम  पुढे न्यायची आहे.आपण सध्या  शक्तिहीन  झालोय. आपणाला नव्याने साधना करावी लागेल.तंत्र-मंत्र सिध्द करावे लागतील. शिवाय नवी मानवी शरीरे धारण करावी लागतील. आपल्याला पूरक अशी परीस्थिती आजच्या तांत्रिक  पिढीने तयार करून ठेवलीय.आजच्या  राज्यकर्त्यांच्या मनात सत्तापिपासूपणा त्यांनी रूजवलाय. प्रचंढ अनागोंदी निर्माण  करून ठेवलीय.सत्तेसाठी एकमेकांचे गळे सुध्दा  हे लोक कापायला मागेपुढे पाहत नाहित. हे सारे आपल्याच वंशजांनीच केलय.आता आपल्याला नव्याने  घाव घालायचा आहे. सध्याच वातावरण आपल्याला पूरक आहे.  " आचार्य, कृतांताच्या सांगाड्याच काय?" एका शिष्याने विचारल." त्यालाही उठवायच आहे. तोच आपल शस्त्र  असणार आहे. अर्धवट जीवंत केलेल्या कृतांतात पुन्हा नव्याने शक्तीची स्थापना करावी लागेल. त्याला आपला पूर्वीचा जन्म  आठवणार नाही...पण त्याची क्रूरता...अमानुषपणा तसाच राहिल."आता चक्रधर व त्याचे आठ शिष्यांचे सांगाडे एत्रितपणे मंत्र  म्हणू लागले. कृतांताच्या सांगाड्याची हालचाल सुरू झाली.तो भला मोठा सांगाडा  थडथडू लागला.मंत्रघोष वाढला.त्या आवाजाच्या कंपनाने गोदामाचे पत्रेही कंप पावत होते व आवाज निर्माण वहोत होता . पण याची कोणालाच कल्पना  नव्हती. अखेर एका क्षणी कृतांताच्या हाडाचा सांगाडा उठून उभा राहिला. इकडे तिकडे हातवारे करत तो बेफामपणे थैमान घालू लागला.चक्रधराना बोटाच्या  हाडाने त्याच्या कवटीला स्पर्श केला तसा तो सांगाडा शांत झाला." चला आपल्याला आता बाहेर जायचे आहे.लवकरात लवकर या हाडांच्या सापळ्यांचा त्याग करून मानवी देहात शिरणे गरजेचे आहे.मानवी देह धारण केल्याशिवाय आपल कार्य सिध्द होणार नाही. "सारे सांगाडे चालत दरवाजाजवळ  आले.बाहेरून दरवाज्याला कूलूप घातले होते.चक्रधराने दरवाज्याला स्पर्श  केला. बाहेरच्या बाजूला असलेले कूलूप तडकन तुटले व झोपा काढत असलेल्या चौकिदाराच्या पायावर आदळले. डोळे  चोळत तो धडपडून जागा झाला. काय घडलय समजायच्या आतच समोरच्या  दरवाज्याची कडी खाडकन सरकली व दरवाजा  उघडला.दरव्याज्यातून दहा सांगाडे विचित्र  हालचाली करत बाहेर पडले.चालणारे ते सांगाडे बघून त्याची बोबडी वळली.त्...त् ..प...प ..करत तो पळण्याचा प्रयत्न  करू लागला.पण त्याचे पाय हलेनात.शरीर जड झाले.त्याच्या जाणीवा त्याला सोडून गेल्या व धडकन खाली कोसळला.  ते दहा सांगाडे  समोरच्या जंगलात शिरत नाहिसे झाले.------*------*--------*----*----*-------*----त्या रात्री गौरी अग्रवाल  उत्खननात सापडेल्या वस्तू व तलवार समोर ठेवून त्यावरचे लिखाण वाचण्याचा प्रयत्न  करत होती.आर्किओलाॅजी शिकत असताना काही लिपींचा अभ्यास तिनेही केला होता.पण या वस्तूंवरची भाषा खरच अगम्य होती. पण त्या वस्तूवर व तलवारीवर काहीतरी मंत्र  लिहिले होते हे नक्की! या सगळ्या वस्तूंचे फोटो व लिखाण  तिने लॅपटॉपमध्ये साठवले होते.उद्या  राज सरदेसाई  आले की या सगळ्याचे गूढ त्यांच्या मदतिने उकलता येईल असे तिला वाटले. गोदामापासून तीची राहूटी बरीच दूर होती तरीही तिल्या काही गूढ आवाज व अंगावर शिरशिरी आणणारा गार वारा जाणवला होता.रात्री  खूप उशिराने ती झोपली.  सकाळी  तिला जाग आली ती कामगारांच्या आरडा ओरडीने.साईटवर गोंधळ  माजला होता. काही कामगार गोदामाच्या चौकिदाराला घेवून  आले होते.चौकिदार शून्यात नजर लावून फक्त  समोर बघत होता. तो बोलत नव्हता ...त्याचा चेहरा सपाट होता. साले कामगार  दहशतीखाली होते.घाबरलेले होते." काय झाल.." डाॅ गोपाल शर्मा यांनी एका कामगाराला विचारले." साहेब. भगवानदास ...कसतरीच करतोय...त्याला कुणीतरी  झपाटलय...आणि  गोदामाचा दरवाजा उघडा आहे..."" मौर्ये, इथ कुठे  डाॅक्टर मिळतोय का बघा."डाॅ.  शर्मा व गौरी गोदामात धावतच गेली.तिथली परिस्थिती बघताच दोघेही हादरले. गोदामात एकही सांगडा नव्हता. सांगाडे गायब झाले हे कळताच सारेच घाबरले. कामगारात कुजबूज सुरू  झाली.हा काहीतरी भयानक प्रकार असावा...कदाचित भुताटकी असावी. इथले काम सोडून जाव हेच चांगले  अस ते म्हणू लागले.डाॅ. शर्मा तर डोके धरून बसले.असा प्रकार त्यांच्या  कारकिर्दीत कधीच  झाला नव्हता.    हा सगळा  गोंधळ  चालू असतानाच गौरी धावतच आपल्या राहूटीत गेली.तिथल्या सगळ्या  वस्तू जाग्यावरच आहेत हे पाहून ती शांत झाली. सगळ्या  वस्तू  व्यवस्थित  ठेवून ती गडबडीत बाहेर पडली.बाहेर पडताना ती कुणाला तरी धडकली." डोळे  फुटलेत काय. बघून चालता येत नाही."ती वैतागली.समोर एक वीस- पंचवीस वर्षांचा तरूण होता. " कोण रे तू? तू इथ कसा...या घटनांशी तूझा काही संबध तर नाही ना?"" मॅडम , कुठची घटना...कसला संबध? मी राज सरदेसाई...मी इथ आलो नाही .मला बोलावलय."गौरी वेड्यासारखी त्याच्याकडे पाहतच राहिली.------*-----*------*-----*-----*-------*---भाग १ समाप्त बाळकृष्ण सखाराम राणे