सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षा होईल?
आपण जीवन जगत असतो. असं जीवन जगत असतांना नेहमी संकटं आपल्या पाचवीला पुजलेलेच असतात. त्यावर आपण मात करीत करीत मार्ग काढत असतो. ज्यासाठी आपल्याला निर्ण घ्यावेच लागतात. कधी ते निर्णय फसतात.
म्हणतात की मेहनत करावी व मेहनतीचं खावं. परंतु आपण पाहिलं की मजूर वर्ग हा अति मेहनत करीत असतो. परंतु त्याच्या मेहनतीच्या स्वरुपात त्याला फळ मिळते का? याचं उत्तर नाही असंच येतं. परंतु जे लोकं मेहनत करीत नाही. त्यांना कष्ट न करताही सारं मिळतं. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे त्याचं नशीब. त्याच्या नशिबात जे लिहिलेलं असेल ते मिळत असतं.
आपल्याला आपल्या नशिबानुसार कमी अधिक स्वरुपात फळ मिळतं. आपण नेहमी पाहतो की जो व्यक्ती त्या लाभाच्या लायक नाही, त्यालाही तो लाभ मिळतोच. कारण ते फळ त्याच्या नशिबात असतं. या नशिबाचा आणखी जास्त पटीनं शिक्षक जीवनात विचार केल्यास शाळेतील मुख्याध्यापक पद हे कधीकधी आपण जेष्ठ असूनही आपल्याला मिळत नाही वा शाळेतील नोकरी मिळत नाही आणि जे लायक नसतात. त्यांना ते पद लवकर मिळतं वा त्याला नोकरी लवकर मिळते. कधी आपल्याला विनाकारण त्रास नको म्हणून आपण ते पद नाकारतो. यात आपल्यापेक्षा नातेवाईक असलेल्या शिक्षकांना पद मिळणं हेही त्या त्या शिक्षकांच्या चांगल्या भाग्याचंच फळ असतं.
शाळेबाबतीत विचार करतांना एखाद्या संस्थेत त्या संस्थाचालकाचं नातेवाईक बनणं हे देखील चांगल्या भाग्याचंच लक्षण असणं. जो चांगल्या भाग्याचा असेल, त्याच्या भाग्यात संसारोपयोगी सुख असतंच. प्रत्येक व्यक्ती हा अंबानीच्या घरी जन्मास येत नाही. काही गरीबही घरी जन्मास येत असतात. काहींचे मायबाप हे जास्त दिवस जीवंत असतात व त्यांना वाटत असते की केव्हा मरण पावतात, केव्हा नाही तर काही लोकांचे मायबाप हे लहानपणीच मरण पावतात. हे सर्व आपल्या भाग्यानुसार घडत असतं.
त्रास...... त्रासाबाबत बोलायचं झाल्यास प्रत्येकाला त्रास असतोच. कोणाला संस्थाचालकाचा त्रास असतो. कोणाला शारिरीक व्याधींचा त्रास असतो. कोणाला पतीचा व सासूसासऱ्यांचा त्रास असतो. कोणाला माहेरचा त्रास असतो. कोणाला शेजारापाजाऱ्यांचाही त्रास असतोच. त्रासानं कोणालाच सोडलेलं नाही. शाळेत मुख्याध्यापक पदाचे आपण दावेदार असतांना आपण विचार करतो की मला हे पद नको. मला संस्थाचालकाचा त्रास होईल. ते पद आपण स्वखुशीनं सोडतो. कारण आपल्याला त्रास होणार असतो. परंतु आपण ते पद जरी सोडत असलो तरी त्रास आपला पिच्छा सोडत असते काय? तर याचंही उत्तर आहे, नाही. तो त्रास आपल्याला पाचवीला पुजलेला असतोच व तो त्रास आपल्या शारिरीक व्याधीतून आपलं रुप दाखवत असतं.
या सर्व गोष्टी नशिबानं घडतात. आपल्या जीवनात अमूक अमूक संकटं येतील. हे लिहिलेलंच असतं. म्हणतात की आपण सहा दिवसाचे असतो. तेव्हा सटवी येते व आपलं नशीब लिहून जाते. परंतु हे जरी खरं असलं तरी एखादं बाळ गर्भात मरण पावतं. एखादं बाळ गर्भाच्या बाहेर पडल्यावर मरण पावतं. ते नशीब कुणाचं? त्यावेळेस नशीब नसतं काय? एकंदरीत नशिबाच्या भाषेत विचार केल्यास ते नशीब आईचं असतं. तिच्या पापपुण्यानुसार तिच्या बाळाचं निधन होत असतं. आता कोणी म्हणतील की मी पापच करीत नाही, तरी माझ्या जीवनात एवढं दुःख का? तर आपण जीवन जगत असतांना आपली जेव्हा बाल्यावस्था असते. त्यावेळेस आपण पाण्यात दगडं मारतो. ज्यातून बेडकं मरण पावतात. आपण फुलपाखरांना पकडतो. ज्यातून त्यांना वेदना होतात. आपण सरड्यांना तंबाखू चारतो. ज्यातून त्यांचा छळ होतो. आपण कुत्र्याच्या शेपटाला फटाके बांधतो. ज्यातून त्याला त्रास होतो. मग कर्म परत येतं व तेच कर्म आपल्याला त्रास देत असतं. आता यावर आपला आणखी प्रश्न असेल, की लहानपणी एखाद्या बाळाचे आईवडील मरण पावतात. त्यानं कोणतं पाप केलेलं असतं? त्याचे आईवडील मरण पावणे हे त्याच्या पुर्वजन्माचं पाप असतं. तो त्या जन्मात एखादा वाघोबा असेल आणि त्यानं कित्येक पशुपक्षी खाल्ले असेल, कित्येक लेकरांना त्याच्या मायबापापासून अनाथ केलं असेल तर त्यालाही अगदी बालवयातच अनाथ व्हावं लागतं. निसर्गाचा नियमच आहे की आपण एखाद्याची हत्या करा. आपलीही हत्या होणारच. मग ते पशुपक्षी का असेना. मांस खाणाऱ्या व्यक्तींना साहजीकच म्हातारपणात जास्त त्रास होतच असतो. हा पापकर्म आणि नशिबाचाच भाग असतो. आता कोणी नशीब मानत नाहीत. पाप कर्म मानत नाहीत. मायबापाची सेवा करीत नाहीत. त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात. परंतु आपण त्यांना वृद्धाश्रमात पाठवतो. पुढं आपली मुलंही आपल्याला वृद्धाश्रमात पाठवतीलच. हा नियम आहे.
त्रास....... त्रास होणारच. तो नशिबात लिहिलेलाच असतो. परंतु तो त्रास आपण आपल्या कर्मानं दूर करु शकतो. त्यासाठी चांगले कर्म करण्याची गरज आहे. आपल्या हातून आपले कर्म जर चांगले घडून येत नसतील तर आपल्याला कोणीही फसवू शकतो. जरी आपण हुशार असलो तरी. परंतु असे घडत असतांना आपले जर कर्म चांगले असतील तर आपली अशा प्रकारच्या फसवेगिरीतून सुटका होत असते. परंतु आपल्याला माहितच आहे की आपण हुशार आहोत व अशा प्रकारचे कोणतेही संकट आले तरी आपण न घाबरता त्यातून मार्ग काढू शकतो. त्यासाठी आपण स्वतः खबरदारी घेत असतो. अगदी डोळ्यात तेल टाकून स्वतःला जपत असतो. परंतु अशी खबरदारी आपण तेव्हाच घेतो. जेव्हा आपल्याला त्याबाबतीत शिक्षण असेल, असं शिक्षण नसेल तर आपल्याला काहीच करता येत नाही. अति हुशारी व हुशारी नसणे या दोन्ही गोष्टी आपल्या काही कामाच्या नाही. आपल्याला वाचता येते. परंतु आपण ऐनवेळेस वाचू शकत नसेल, तर आपल्याला वाचता येण्याचा काहीच उपयोग नाही.
सध्या शिक्षणाची व्यवस्था कालसारखी राहिलेली नाही. काल पुस्तक रुपात ज्ञान मिळत होतं. आज तेच ज्ञान ऑनलाइन मिळत असतं. याचाच अर्थ असा की ऑनलाइन शिक्षण घेवून आपणाला नसलेलं ज्ञान मिळवता येत. त्यासाठी शासनानं प्रत्येक शिक्षकांनी वर्षभरात पन्नास तासिकेचं प्रशिक्षण घ्यावं. अशी ताकीद सर्वच शिक्षकांना दिलेली आहे. हे कशासाठी तर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी घडवायचे आहे. त्यासाठी ऑनलाइन ज्ञान मिळवायचे आहे. परंतु हे जरी बरोबर असलं तरी ज्ञान मिळवित असतांना शासन हे सांगत नाही की कोणत्याही लिंक दाबा. त्यासाठी स्वतःच स्वतःची सुरक्षा घेतलेली बरी. कारण अलिकडील काळात सायबर गुन्हे घडत आहेत व लोकं लोकांना फसवत आहेत. त्यात शिक्षकही आहेत की जे स्वतःच समाजाचा आरसा असून फसतात. मग तेच जर फसत असतील तर ते आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संपर्कात येत असलेल्या पालकांना कसे बाहेर काढतील. या दृष्टिकोनातून शासनानं शिक्षकांसाठी शिक्षणाचे ऑनलाइन स्रोत व सायबर सुरक्षा हा विषय आणलेला आहे. ज्यातून शिक्षकांनी स्वतः स्वतःची सुरक्षा करावी, आपल्या विद्यार्थ्यांचीही सुरक्षा करावी व त्यासोबतच आपल्या संपर्कात येत असलेल्या पालकांचीही सुरक्षा करावी. अन् जेव्हा एखादा शिक्षक असे करेल. तेव्हा आपोआपच समाज सुधरेल. सायबर गुन्हे घडणार नाहीत. सायबर सुरक्षाही होईल व देशही सायबर गुन्ह्यापासून सुरक्षीत राहील. यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०