६
तो ऋतू परीवर्तन आणणारा होता. तसा आज पाऊस पडला होता. गार वारेही सुटले होते. त्यातच तिला आठवला देव. ज्याला तिनं महाभयंकर त्रास दिला होता. आज तो तिच्या सकाळी स्वप्नातही येवून गेला होता.
ती दुःखातच होती. कारण तिचे पती. आज तिनं विवाह केले होते. तसे तिचे चार पाच विवाह झाले होते व हा चवथ्या क्रमाकांचा पती मुस्लीम होता. तिचं आतापर्यंत कोणाशीच पटलं नव्हतं. ज्यातून तिला सर्वांनीच सोडलं होता व आता नाईलाजास्तव तिला वेगळ्या धर्माच्या व्यक्तीचा पती म्हणून स्विकार करावा लागला होता.
तिचा तो पती. तो मुस्लीम होता व त्यानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यातच त्यानं तिच्याशी निकाह केला होता.
मंजूचा निकाह झाला होता व तिचं नावही बदलवलं गेलं होतं. त्यातच ती जरी धर्मानं हिंदू असली तरी मुस्लीम कायद्यानुसार ती मुसलमान बनली होती.
तिनं मुस्लीम व्यक्तीशी विवाह केल्यानं आईवडिलांनी जात धर्माच्या नावानं तिला तोडलं होतं. आता ती आपल्या घरी येत नव्हती. कारण तिच्या आईवडीलांनी तिला यायला मनाई केली होती.
तो मुस्लीम समाज. त्यातच तिनं विवाह करुन मुस्लीम मुलगा निवडला होता. परंतु ती सुखी नव्हती. कारण त्या धर्मात तिला एक उपभोग्य वस्तू व मुलं पैदा करणारी मशीन समजलं जात होतं.
मंजूनं जसा मुस्लीम युवकाशी निकाह केला. तसं तिचं नावही बदलवलं गेलं होतं. तिचं नाव रुबिया ठेवलं होतं. तसंच त्याचं नाव मोहम्मद फाजील होतं.
मोहम्मद फाजील नावासारखाच होता. तो कामाला जात होता. परंतु सायंकाळी घरी येताच दारु प्राशन करुन यायचा. त्यातच तो तिची कोणतीच गाऱ्हाणी ऐकायचा नाही. अन् तिनं सांजच्याला काही कुरकूर केलीच तर तो तिला मारायचाही.
मंजूनं मुस्लीम व्यक्तीशी विवाह केला. कारण तो तिला फॅशनेबल दिसला होता. मोहम्मद फाजीलनं तिला भाळविण्यासाठी फॅशनेबलचं नाटक केलं होतं. परंतु तो फॅशनेबल नव्हता. ना ही त्याला नवीन बदल आवडत होता. त्याला अंधश्रद्धा फार आवडत होत्या.
मंजूशी विवाह केल्यानंतर त्यानं तिला बुरख्यातच ठेवलं. त्यानं तिच्या इच्छास्वातंत्र्यावर बंधनं आणली. त्यानं तिचं फिरायला जाणंही बंद करुन टाकलं होतं. घरीच राहा व घरची सगळी कामं कर. एवढंच तिचं अस्तित्व त्यानं करुन टाकलं होतं. शिवाय मंजू ही फॅशनेबल असल्यानं तिला ते जीवन आवडत नव्हतं. तिला आवडत होतं फिरणं. घार जशी स्वच्छंद आकाशात विहरते. तसंच स्वच्छंद आकाशात विहरणं. फॅशनेबल राहाणं, तोकडे कपडे घालणं. तिला आवडत होतं. आज त्या सर्व गोष्टीवर बंधनं आली होती.
मंजूनं फाजीलशी विवाह करताच जे बंधन तिच्यावर आलं होतं. ते तिला असह्य होतं. आता तिला देव आठवत होता व देवनं दिलेलं सुख आठवत होतं. शिवाय पळून जाताही येत नव्हतं व पळून जावं कसं हाही एक प्रश्न तिच्यासमोर होता. पळून गेल्यावर आपण कुठं राहू? कसं जगू? हेही प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभे होते.
ते बंधन युक्त जीवन मंजूचा श्वास दाबून टाकत होते. कारण कुठंच जाण्याची उजागिरी नव्हती. ना तिला कोणत्याच परपुरुषांशी उजागिरीनं बोलता येत होतं. जर ती एखाद्यावेळेस परपुरुषांशी बोललीच, तर फाजील तिच्यावर आगपाखड करीत असे. तसं पाहिल्यास फाजील हा संशयी वृत्तीचा व्यक्ती होता.
मंजू विचार करीत होती त्याला सोडण्याचा. परंतु ती त्याला सोडू शकत नव्हती. ते बुरखाधारी जीवन तिला आवडत नसल्यानं तिला त्या जीवनाचा त्यागही करावासा वाटला. परंतु आजतरी त्यावर कोणताच उपाय निघत नव्हता.
मंजू आपल्या पतीच्या वागण्याचाच विचार करीत होती. त्यावर ती विचार करु लागली होती. तसा तिला तिच्या पतीच्या वागण्यावरुन आठवला तो अवैध पार्किंगचा विषय. कारण त्याचंही एक दुकान होतं नाश्त्याचं. त्या नाश्त्याच्या टपरीवर गाड्या रस्त्यावरच उभ्या ठेवल्या जात होत्या नव्हे तर पार्किंग केल्या जात होत्या. ती विचार करु लागली होती त्याच गोष्टीवर.
सध्या देशात पार्किंगची गैरसोय होत आहे. लोकं अवैध पार्किंगने परेशान आहेत. कारण रस्त्यारस्त्यावर गाड्या पार्किंग केल्या जातात व रस्ते अडवले जातात. यात काही धार्मिक स्थळं, काही शाळा महाविद्यालये, काही दुकाने, काही शिकवणी वर्ग व काही आम लोकं की जे गल्लीबोळात राहतात. अशा सर्वच ठिकाणी शोधमोहीम राबवली व दंड लावण्याचे प्रकार प्रशासनानं केले तर देश सुधारण्यासाठी निधी उपलब्ध होवू शकतो. तसाच देश एकप्रकारे सुजलाम सुफलाम करता येवू शकतो व देशाला सुधारणेच्या कक्षेत आणू शकतो.
रस्ता आणि त्यातही आमरस्ता हा काही कोणाच्या बापदादाचा नसतो की त्यावर कोणी अतिक्रमण करावं. परंतु सध्या देशात तेच सुरु आहे. रस्त्यारस्त्यावर पार्किगची जागा नसूनही बरेचसे दुकानदार आपले लहान उद्योग सुरु करतात. त्यातच त्या उद्योगधंद्यावर लोकांची झुंबड उडून लोकांच्या ज्या गाड्या रस्त्यावर लागतात. त्यानं रहदारी जाम होते. लोकांना साधं पायी देखील चालायला जागा उरत नाही. त्यामुळं अशा काही काही आमरस्त्यावर गर्दी झालेली आहे. तो आमरस्ता असूनही. शिवाय ती एक चिंतेची बाब ठरलेली आहे. लोकं सामान्य लोकांचं ऐकतच नाही अन् सामान्य व्यक्तीही अशा प्रकरणात कोणाकडे तक्रारही करीत नाही. त्याचं कारण आहे, ज्या कोणत्या सामान्य माणसानं त्याची तक्रार केली. त्याच सामान्य व्यक्तीचं नाव जाहीर करुन त्यालाच धारेवर धरलं जातं. मग ज्याचं नाव जाहीर होतं, त्या सामान्य माणसांचा राग धरला जातो व त्याचा वचपा काढण्याचे प्रयत्न केले जातात. हेच नाव जर प्रशासनानं गुप्त ठेवलं तर सामान्य व्यक्ती अशा प्रत्येक समस्येची तक्रार करु शकते व प्रशासनात सुधार करण्यासाठी तो मदत करु शकतो. जर त्याचं नाव प्रशासनीक व्यवस्थेत गुप्त ठेवलं जात असेल तर.......
अख्ख्या देशातील शहरे अशा अवैध पार्कींगने त्रस्त आहेत. काही ठिकाणी तर लोकांनी अख्खे रस्तेच गायब करुन टाकले आहेत. ते रस्ते आमरस्ते जरी असले तरी ते खाजगी रस्ते बनलेले आहेत. या रस्त्याची जागा दुकानदारांनी नाही तर आम लोकांनी हडप करुन टाकलेली आहे. प्रशासनाला त्याची माहिती नाही आणि कशी असेल. कारण प्रशासनाकडे कोणीच तक्रार केलेली नाही आणि करुही शकत नाहीत. कारण तक्रारदाराला प्रकरणात गुंतविण्यात येतं म्हणून.
हे जीवन आहे व जगणं अतिआवश्यक आहे. असं जीवन जगत असतांना बरीचशी मंडळी ही लोकांना त्रास देत देत जगत असतात आपल्या पतीसारखी. त्यात ते आपल्यावर होणार असल्याच्या परिणामाची पर्वा करीत नाहीत. होईल तेव्हा होईल कारवाई. आज तर आपलं भागतं ना. असा विचार करुन लोकं अख्खा रस्ताच ताब्यात घेवून टाकतात. हे सामान्य माणसं व दुकानदारच करीत नाहीत तर काही धार्मिक स्थळंही आमरस्त्याला धार्मिक स्थळाचा रस्ता बनवून टाकतात. काही ठिकाणी तर चक्कं धार्मिक स्थळ अगदी रस्त्याच्या मधोमध असतात. ज्यात गर्दी होते व गाड्या लावण्यातून रस्ता रहदारी जाम होते. त्याठिकाणी व्यक्ती काहीच करु शकत नाहीत. कारण ती धार्मिक स्थळं श्रद्धेची स्थळं असतात व तशी श्रद्धा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. ते धार्मिक स्थळाच्या नावावर बोंब मारत नाहीत.
हिंस्र प्राणी..... हिंस्र प्राणी हे पाळीव प्राण्यांना मारुन खात असतात. तसंच मानवाचंही आहे. मानव प्राण्यातही जो बलशाली घटक असतो. तो घटक गरीब, लाचार घटकावर अत्याचारच करीत असतो. हे जीवन जगणं काही सोपं नाही. अशाच बलशाली लोकांचा सामना करीत करीत जीवन जगावं लागतं. ज्यातून आपल्याला महाभयंकर वेदना होत असतात. जीवन जगत असतांना काही लोकं निव्वळ त्रासच देत असतात रस्त्यावरच कब्जे मारुन. ते केवळ प्रशासनाच त्रास देत नसतात तर त्यांचा त्रास सामान्य लोकांनाच होतो. ते केवळ त्रास देण्यासाठीच जन्मास आलेले असतात. असंच वाटायला लागतं. ते म्हणतात की आम्ही कुणाला त्रास देत नाहीत. परंतु त्यांचा कळत नकळत त्रास वाटतोच. ही झाली आम रस्त्याची गोष्ट. काही वस्तीतील लोकंही असेच असतात. अलिकडील काळात रस्त्यावर सिमेंटचे बांधकाम झाले आहे व रस्ते फारच उंच आणि घरे रस्त्याच्या खाली गेली आहेत. त्यातच लोकं रस्त्याच्या लगतच असलेले फुटपाथ वापरत आहेत. या फुटपाथवर गडर बनवलेले आहेत. ज्या गडरातून रस्त्यावर गोळा झालेले पाणी पास होत असते. ज्यातून वासही येत असतो. परंतु रस्त्यावर पाणी राहात नाही. परंतु लोकांनी दुर्गंधी येते म्हणून हे रस्त्याच्या कडेवरील गडर सिमेंटने बंद केले आहे व त्या गडरावरच फ्लोरिंग केले आहे. जेणेकरुन पाहायला किंवा तपासायला येणाऱ्या अधिकाऱ्यांनाही तो गडर दिसणार नाही. असे बरेच लोकं आहेत. त्यांना कोण काय म्हणणार. म्हटलं तर अशी मंडळी भांडायला तयार होतात व पत्रव्यवहार केलाच तर नावानं करावं लागतं. मग कोण वाकडं घेणार. अशी अवस्था.
वस्तीत असे बलशाली लोकं राहतात की जे वस्तीतीलच लाचार, गरीब लोकांचा फायदा घेत असतात. काही रस्त्यावर गाड्या लावून रस्ता अडवतात तर काही गडर बुजवून नागरिकांना रस्त्यावरुन चालण्यास प्रतिबंध लावतात. काही समारंभाप्रसंगी मंडप टाकून रस्ता अडवतात. याबाबत आणखी दुसरं उदाहरण आहे. असेही काही व्यक्ती की ज्यांच्या घराचं पुर्णच बांधकाम झालेलं. त्यांनी गाड्या ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था घरात केलेली नाही. ते पार्किंग घराच्या बाहेर असतं. साधारणतः अर्ध्या रस्त्यापर्यंत त्याची पार्किंग असते. त्यातच काहींचे ओटे तर अर्ध्या रस्त्यापर्यंतच असतात. त्यासमोर गाड्या पार्क केल्या जातात. अशा गाड्या लावलेल्या असतात की इतर गाडीवाल्यांनी त्या जागेतून रहदारी करायची कशी? याबाबत बोलायचं झाल्यास एक इंदोर सोडला तर संबंध देशातील लोकं असेच जगत असतात. फुटपाथवर अतिक्रमण करुन बसलेले असतात. दुकान आपल्या पुर्ण जागेत काढतात व पार्किंग रस्त्यावरच करतात की ज्या जागेतूनच गाड्या आणि माणसांना रहदारी करायला त्रास होत असतो. काहींनी तर अख्खे रस्तेच गायब करुन टाकले आहेत. असे लोक व असा समाज. लोकांजवळ स्वतःची कितीही जागा असली तरी ती जागा कमीच असते. काही लोकं तर असे असतात की आपल्या घरच्या बऱ्याच कबाडीच्या वस्तू परीसरातील खाली जागेत पसरवून ठेवत असतात. त्यांना फुकटची कितीही जागा मिळाली असली तरी कमीच पडत असते. तसंच आपल्या अंगणात गडर असल्यास व बुजविल्यास रस्त्यावर पाणी पसरेल. ज्याचा लोकांना त्रास होईल. याचा विचारच करीत नाहीत. उलट आपलं भलं होईल ना. याचाच ते विचार करीत असतात. इतरांचा विचारच करीत नाहीत ते. कोणी गडर बुजवत असतात तर कोणी अख्खा रस्ताच ताब्यात घेत असतात. असे बरेच रस्ते आहेत व असे बरेच गडर अहेत की जे लोकांनी स्वतः बुजविलेले असून त्यामुळं लोकांना त्रास होत आहे. जर सर्वेक्षण केलं तर हे सहज सापडू शकते. हे प्रशासनाचं काम आहे. परंतु कोण करेल सर्वेक्षण. होवू द्या लोकांना त्रास होतो तर. आपल्याला तर त्रास होत नाही ना. असा विचार आम जनताच नाही तर प्रशासन करीत असते. एका वर्तमानपत्रात आलं की रस्त्यावर मंडप टाकून रस्ते अडविल्याने दंड लावला गेला. ज्यातून अमूक अमूक एवढी कमाई झाली. कदाचीत तसंच व्हायला हवं. आजही गल्लीबोळात असे कितीतरी विवाहसोहळे होतात की जे संबंध रस्ते अडवतात. काही लोकं गाड्या रस्त्यावर ठेवून बळजबरीनं रस्ते अडवतात. अशा ठिकाणी प्रशासनानं एक पाऊल पुढं टाकून कारवाई करायला हवी व जास्तीत जास्त दंड लावायला हवा व ताकीद द्यायला हवी की जो गडर बुजवेल. जो रस्त्यावर पार्किंग करेल. जो संबंध रस्ताच ताब्यात घेईल. त्या लोकांची घरंच जप्त करण्यात येतील. असं जर झालं तर रहदारीचे रस्ते मोकळे होतील. लोकांना वाहन चालवितांना त्रास जाणार नाही. तसेच लोकं राहतही महसूस करतील. त्यातच दंड होते म्हणून लोकं परीसरात कचरा करणार नाहीत. परीसरही स्वच्छ ठेवतील यात शंका नाही. तशीच स्वतःची पार्किंग ही घराच्या आतच बनवतील याबाबतही शंका नाही. प्रशासनानं ही देखील एक शोधमोहीम राबवावी. देशाला सबळ व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी प्रशासनाला जर निधीच उपलब्ध करायचा असेल तर गरीब लोकांच्या व कामाला जाणाऱ्या मजूरांच्या गाड्यांचे चॅलन करुन त्यांना छळण्यापेक्षा हा उपाय बरा आहे हे तेवढंच खरं. यातून बराच निधी उपलब्ध होवू शकतो. जो देशाच्या सुधारण्याच्या कामात येतो. यासाठी विशेष पथक स्थापन करावं लागलं तरी चालेल.
मंजूचं तेच मत. माझं जीवनही असंच आहे. या जीवनात जगणं असह्य आहे. माझा पती मला पुरेसंही स्वातंत्र्य देत नाही. स्वातंत्र्यानं जगू देत नाही. या बुरख्यात माझा श्वास कोंडला जातोय. त्यापेक्षा तोच बरा होता देव. जो मला उच्चतम दर्जा देत होता. माझ्या भावना जोपासत होता. माझ्या इच्छा तृप्त करीत होता. विनाकारणच त्याला मी त्रास दिला. अन् आता मला तेच भोगमान आले. यानं मला पार्किंगसारखं वापरलं. आपण याला सोडायला हवं असं मला वाटतं. परंतु मी त्याला सोडू शकत नाही. कारण मी जर त्याला सोडलं तर तो माझा जीवच घेवून टाकेल.
ती तिची इच्छा. तसा काळ लोटला जात होता तिच्या दुसऱ्या विवाहाचा आणि ती गरोदरच राहात नव्हती. तेच कारण होतं मोहम्मद फाजीलसमोर तिला तलाक देण्याचं. त्यानं तिला मुलं पैदा करण्याची जणू मशीनच समजलं होतं. परंतु ती तिच्या उदरातून मुल जन्मास घालू शकत नसल्यानं त्यानं तिला तलाक द्यायचं ठरवलं व लागलीच त्यानं तिला तलाक दिला.
मायबापापासून तुटलेली ती मुलगी. त्यातच फाजीलनं तिला तलाक देताच ती अस्ताव्यस्त झाली. कसं जीवन जगावं, कसं नाही ते तिला कळत नव्हतं. त्यातच तिनं एका जुन्या मैत्रीणीशी संपर्क साधला व ती तिथेच राहू लागली. तिनं काही दिवस आपल्या मैत्रीणीचा आधार घेतला.
ते मैत्रीणीचं घर. तिथं तरी ती किती दिवस राहणार होती. तिनं विचार केला व तिनं पुन्हा आपला जोडीदार शोधला. ती आपल्याच मैत्रीणीच्या घराशेजारी राहणाऱ्या मुलांवर प्रेम करु लागली व लवकरच ती रफुचक्कर झाली.
हे तिचं पहिलं प्रेम होतं. हा पाचवा पती निकम्म्या स्वभावाचा निघाला. तो कामावरच जात नसे. तिलाच कामावर पाठवत असे. अन् रात्री ती घरी आलीच की तिला मारतही असे. तिनं कमावून आणलेले पैसे हिसकत असे. त्याची तो दारु पित असे.
तिला आठवत होता देवनं सोडल्यानंतरचा काळ. ते ती करीत असलेले विविध विवाह. त्यातच तिला मिळत असलेले पती. कोणी दारु पियक्कड तर कोणी मुलं जन्मास घालणारी मशीन समजणारा. ज्यातून ती आपले पती सोडत गेली. एकतरी चांगला मिळेल असं तिलाही वाटत होतं. परंतु तिचं प्रारब्ध खराब होतं की तिला चांगला पती मिळत नव्हता. विवाह हा तिच्यासाठी मनोरंजनाचा विषय ठरला होता.