७
हा पाचवा पती होता की त्या पतीनं तिला फिरायला नेलं होतं. तो गोव्याचा समुद्र तिला हुलकावणी देत होता. तशी त्यानं तिलाही हुवकावणी दिली होती. तिला काय माहीत होतं की तो पती गोव्याला नेवून तिला सोडून देईल. अगदी तसंच घडलं होतं. त्यानं सांगितलं होतं की तो दुकानातून येतोय. तो दुकानात गेला व गायब झाला होता.
आपण फिरायला जातो. कारण आपल्याला फिरणे आवडते. निसर्ग पाहाणं आवडतं. किल्ले व प्रेक्षणीय स्थळं पाहाणं आवडतं. जंगल, वनसंपदा व प्राणी पाहाणं आवडतं. विचित्र वस्तू, व्यक्ती पाहाणं आवडतं. धार्मिक स्थळं पाहाणं आवडतं. धरणं, जलाशयं, नदी, नाले, समुद्र पाहाणं आवडतं. त्यात अंघोळ करणं आवडतं. त्यासाठीच आपण फिरायला जात असतो.
फिरणे अतिशय सुंदर कृती. कुणी सहलीसाठी फिरायला जात असतात तर कुणी घरी कंटाळवाणं वाटते म्हणून फिरायला जात असतात. कुणी कामानिमित्त फिरायला जात असतात. कुणी मनोरंजन म्हणून फिरायला जात असतात तर कुणी देवदर्शन तर कोणत्या कारणानं. फक्त त्यांच्यासाठी फिरणं महत्वाचं असतं.
फिरायला जाण्याचा बेत. तो बेत जर घरात माहिती पडला तर भरपूरच आनंद आणि उत्साह संचारतो आपल्या परिवारात. अगदी ताजेतवाने झाल्यासारखे वाटत असते. एवढं फिरण्याला महत्व आहे.
फिरणे हे कुठे व्हायला हवे? असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. फिरायचं असेल तर एखाद्या भकास टेकडीवर आपण जात नाही. ना मोकळ्या मैदानात आफण फिरायला जात. मग आपण फिरायला कुठे जातो? फिरायला जातो आपण एखाद्या तलावाच्या काठावर. एखाद्या शेतात. एखादी नदी पाहायला. जंगल पाहायला. मंदिरं पाहायला. त्यातल्यात्यात आपण फिरायला जातो किल्ले व वस्तुसंग्रहालय पाहायला आणि प्राणीसंग्रहालय पाहायला. आता फिरायला जातो कुत्रीम निर्माण झालेले रिसॉर्ट पाहायला. ज्यात मनोरंजनासोबतच जेवनही असतं.
अलिकडे अशी बरीच ठिकाणे निर्माण झाली आहेत की त्या ठिकाणी मनोरंजनच मनोरंजन असते. अशा ठिकाणी बैलगाडीतून फिरायला मिळते. जे शहरातील मुलांनी पाहिलेलं नसतं व बैलगाडीतून बसून प्रवास करणे त्यांना अतिशय मनोरंजनाचं वाटतं. कधी उंट वा हत्तीवर बसून स्वारी करायला मिळत असते तर कधी घोड्यावरील स्वारी करायला मिळते. या रिसॉर्टमध्ये जादूचे खेळ असतात. काचेवर उभ्या राहणाऱ्या व माठ घेवून नृत्य करणाऱ्या स्रिया असतात. याच स्रिया थयथय काचाच्या तुकड्यावरही नाचत असतात. तशीच रिसॉर्टमध्ये दोरीवर खेळणारी व कलाकृती दाखविणारी मुलं असतात. त्या मुली सर्कशीत जसं दाखवलं जातं. तशाच करतबी या दोरीवरही दाखवतात. त्यातल्यात्यात आपल्याला पाहायला मिळणाऱ्या कळसुत्री बाहुल्या. त्याही आपल्याला रिसॉर्टमध्ये पाहावयास मिळतात. अलिकडील काळात फिरायला रिसॉर्टमध्ये गेल्यावर रिसॉर्टमध्ये त्यांची स्वतःची बससुविधा असते. ते जंगल फिरायला नेत असतात. त्यातच त्या बसमधून फिरायला गेल्यानंतर आपल्याला वन्यप्राण्यांचेही दर्शन होत असते. तसंच अलिकडील रिसॉर्टमध्ये पोहोण्याच्याही सुविधा आहेत. त्यातच नावेतूनही फिरवत असतात. हे सगळं फिरुन झालं की मग जेवन तेही स्वादिष्ट व रंगारंगीचं मिळत असते.
रिसॉर्टचं शुल्क भरपूरच असते की जे शुल्क सामान्य लोकांना परवडत नाही. परंतु असं शुल्क जरी परवडत नसलं तरी ते शुल्क तिथं जे काही पाहायला मिळतं, जे काही खायला मिळतं. अन् जे काही तिथं मनोरंजन होतं. त्यापेक्षा जास्त मोठं नसतं.
फिरण्यातून हवामान बदल होतो. नवा उत्साह मनात निर्माण होतो. कार्य करण्याचा जोम निर्माण होतो. एवढंच नाही तर फिरण्यातून मन प्रफुल्लित होत असतं. तशीच वर्षभर मनावर आलेली मरगळ फिरण्यातून दूर होत असते. परंतु हे जरी खरं असलं तरी कधी कधी फिरण्याला गालबोट लागत असतं. जेव्हा अपघात होत असतो. असे बरेचसे अपघात झालेले आहेत. जसे दोन वर्षापुर्वी एका शहरात विद्यार्थ्यांच्या बसला झालेला अपघात. एक विद्यार्थ्यांची बस सहलीनिमित्य विद्यार्थ्यांना फिरायला नेत होती व अपघात घडला. दुसरी घटना अशीच घडली होती. पंढरपूर यात्रेनिमीत्य भाविकांना फिरायला नेणाऱ्या एका बसचा पंढरपूरवरुन परत येत असतांना अपघात झाला होता. असे कितीतरी अपघात आहेत की जे लोकांच्या फिरायला जाण्यावर बंदी आणतात. परंतु तरीही लोकांना फिरायला जाणं आवडतं. कधी कोणी फिरायला गेल्यानंतर जलाशयात पोहतांना डुंबून मरण पावतं तर कधी वन्यप्राण्यांच्या कचाट्यात सापडून मरण पावतं. कधी धार्मिक स्थळावर आतंकवादी हल्ले झाल्यानं मरण पावतं तर कधी धार्मिक स्थळावर पुरसदृश्य स्थिती निर्माण झाल्यावर मरण पावतं. नुकतीच घडलेली पहलगामची घटना होती. त्याही घटनेत भावीक फिरायलाच गेले होते. ज्यातून कुंकू पुसलं गेलं. ज्यासाठी ऑपरेशन सिंदूर करावं लागलं.
फिरणे..... फिरणे ही जरी कृती चांगली वाटत असली तरी त्या फिरण्यातून आपल्यावर संकटं येत असतात. अशी संकटं येत असतात की त्यातून आपण सावरु शकत नाही. कधी आपलेच प्रियजण मरण पावत असतात तर कधी आपला आधार जगातून निघून जात असतो. तरीही लोकं कालापकाल ते सर्व विसरुन पुन्हा नव्यानं फिरायला जात असतात. महत्वाचं सांगायचं झाल्यास फिरणे ही एक चांगली बाब आहे व फिरायलाच जायलाच हवं. कारण त्यातून आपल्या मनात नवा जोश व उत्साह निर्माण होत असतो. हे जरी खरं असलं तरी फिरण्यातून जे संकट निर्माण होत असतं. त्यामुळं अख्खा परीवार नेस्तनाबूत होत असतो. परीवारातील आनंदही नेस्तनाबूत होत असतो. म्हणूनच फिरायला अवश्य जावं. परंतु स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी. जेणेकरुन आपल्यावर दुर्भाग्य कोसळणार नाही. आपत्तीही कोसळणार नाही आणि कोसळलीच तर त्यातून सावरण्याची ताकद स्वतःच स्वतःमध्ये निर्माण करावी. ज्यातून तुम्ही स्वतःला सावरु शकाल व त्यानंतर नवीन दिशा ठरवू शकाल एवढंच सांगणं आहे.
मंजूही प्रेमाप्रेमानं आपल्या पतीसोबत फिरायला गेली होती. त्या गोव्याला की ज्या गोव्यात समुद्राचं निसर्गरम्य वातावरण होतं. त्या लाटा होत्या की ज्या उसळत होत्या आणि त्या लाटांचा ती आनंद घेत होती. तो आणि तिचा पती गोव्यात लाटांचा अनुभव घेत होते. तोच तिला पती म्हणाला,
"मी दुकानातून येतोय."
तो दुकानात गेला. त्यानंतर तो परतलाच नाही. सायंकाळ झाली होती. बरीच वाट पाहिली. परंतु तिचा पती काही परतलाच नाही. तो कुठे गेला तेही कळलं नाही. शेवटी ती निराश झाली व आपल्या कमऱ्यात आली. तिथं त्याची बॅग व कपडे सारेच होते. काय झालं कळायला मार्ग नव्हता. तसा जवळ पैसाही नव्हता.
तिला आठवत होता तो पती. सकाळपासून दुपारपर्यंत जवळ असलेला. दुकानात जातो असं निमित्त सांगून तो निघून गेलेला. परंतु दुपारनंतर कधीच न परत आलेला. तशी भूक फार लागली होती. काय करावं सूचत नव्हतं. जवळ आणलेलं सारं जिनस संपलं होतं. तशी ती रडायला लागली. तोच त्या कमऱ्याचा मालक तिथं आला. त्यानं पाहिलं की एक स्री रडत आहे व ती का रडत आहे हे कळायला मार्ग नव्हता.
तो कमऱ्याचा मालक. त्याला दयामाया नव्हतीच. त्यानं तिला रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा त्याला कळलं की तिचा पती तिला सोडून दुकानात जातो असं कारण सांगून निघून गेलेला आहे. तो कुठे गेला? त्याचं काय झालं? ते कळलं नाही. शिवाय तिच्याजवळ पुरेसे पैसेही नाहीत. खायचेही जिनस संपलेले आहेत. भूक फार लागली आहे. म्हणूनच ती रडत आहे. काय करावं सूचत नाही.
ते तिचं उत्तर. तसा मालक म्हणाला,
"मॅडम, हा गोवा आहे. इथं तुझ्यासारख्या कितीतरी महिला येतात व तुझ्याच पतीसारखे कितीतरी पती येतात. जे आपल्या पत्नीला विकून टाकतात वा सोडून निघून जातात. कदाचीत त्या तुझ्या पतीनं तुझ्या देहाचा सौदा केलेला असू शकतो. कदाचीत त्यानं तुला विकलेलंही असू शकते. अन् आता हेच भोग तुझ्या वाट्याला येवू शकतात. कदाचीत ज्याला त्यानं विकलेलं असेल, ते लोकं इथं आलेही असतील तुला न्यायला. परंतु तू इथं दिसली नसेल, म्हणूनच तू त्यांच्या हाती लागलेली नाहीस. तेव्हा आताही तुला संधी आहे. तू हा कमरा सोडून जावू शकतेस किंवा तू त्या लोकांच्या स्वाधीन होवू शकतेस. अशी इथं बरीच प्रकरणं घडलेली आहेत. हे मी प्रत्यक्ष नजरेनंच बघत आलेलो आहे व ही प्रकरणं पाहू पाहू आमच्या भावनाही मेलेल्या आहेत. तुझ्या पतीनं ज्या माणसांना विकलं ना. ती माणसं जबरदस्तीनंही नेवू शकतात. हे लक्षात ठेव. कारण ते पैसा मोजलेली असतात. हं, सुटायचं असेल तर आता इथून निघून जावू शकतेस. मी तुझ्याकडून कमऱ्याचा किरायाही घेणार नाही. परंतु जर तू येथून निघालीही. तरीही ती विकत घेणारी माणसं तुझा शोध घेतील. तसेच तुला पकडतीलच आणि धंद्याला लावतीलच. हे इथं रोजच घडत असते."
त्या कमरा मालकानं तिला सगळी माहिती दिली. तशी ती विचार करु लागली. 'आपण केलं ते चांगलं केलंच नाही. आपण मार्गच वाईट निवडला. आपलं सारंच चूकत गेलं. आपण साध्या भोळ्या असलेल्या देवला त्रास दिला. तो चांगला असूनही त्याला सोडलं. आता जेही होईल आपल्या आयुष्यात. त्याचा स्विकार आपल्याला करावाच लागेल. कारण आपण जे केलं, त्याचे भोगमान आपल्याला भोगावेच लागणार.'
ते तिचे विचार. तसा काही वेळ गेला. काही वेळातच ते भक्षक आलेत. ज्यांना तिच्या पतीनं विकलेलं होतं. त्यांनी सरळसरळ तिला जे घडलं ते सांगून टाकलं. त्यानंतर तिही त्यांच्यासोबत जायला तयार झाली. कारण होतं भुकेची पोटात असलेली आग.
आज मंजू वेश्या म्हणून काम करीत होती. तिचा रोजच विवाह होत होता. रोजचेच पती तिला मिळत होते. कारण तिच्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी जेही पुरुष यायचे. त्यांच्यासमोर एकच अट असायची. ती अट म्हणजे विवाह.
मंजूचा रोजच विवाह होत होता तर देवला विवाह करायची अडचण होती. कारण मंजूनं घटस्फोट समाजाकडून घेतला जरी असला, तरी तिनं न्यायालयामार्फत घटस्फोट घेतलेला नव्हता. त्यातच त्याच गोष्टीच्या अनुषंगानं देव करुणाला विवाहाबद्दल धोका देत होता. तो राजरोषपणे विवाह करु शकत नव्हता. कारण त्याला भीती होती की आपण जर असा विवाह केला व ही माहिती मंजूला झाली तर आपली नोकरी जावू शकते. कारण त्याला हे माहीत नव्हते की तिला तिच्या पतीनं गोव्याला नेवून विकून टाकले आहे.
ते वेश्यापणाचं जीवन आज मंजूला छळत होतं. आज तिला पश्चाताप होत होता, त्या विवाहाबद्दल. तिला वाटत होतं की काश! हा विवाह आपण टिकवला असता तर....... तर कदाचीत आपल्याला असं जीवन मिळालं नसतं. आपलंही एक घर असतं. मुलंबाळं सारी असती. जी आपल्या अंगाखांद्यावर खेळली असती. परंतु आपण जे पाप केलं ना. त्याच पापाची शिक्षा आपल्याला भोगावी लागत आहे.
मंजू पश्चातापाच्या अग्नीत जळत होती. त्याचं कारण होतं तिचं वागणं. तिला आता देव आठवत होता. अन् आठवत होतं ते जीवन. जे जीवन तिच्या वागण्यानं तिच्यापासून केव्हाच दूर निघून गेलं होतं. आता उरला होता, तिच्या जीवनात केवळ पश्चाताप. तो पश्चाताप. ज्यात पश्चाताप करुनही प्रश्न सूटत नव्हता.
पापकर्म...... पापकर्माला पापच म्हणता येईल. पापकर्म करत असतांना आपल्याला कशाचीच भीती वाटत नाही. ना आपलं त्या काळात नुकसान होत असतं. परंतु पापकर्म केल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्याची जी फळं मिळत असतात. ती फळं चांगली नसतात. पापकर्माचा अंत हा वाईटच होत असतो.
रामायण काळ....... ज्या काळाला काही लोकं उपाधी देत असतात. काही लोकं म्हणतात की तो काळ झालाच नाही. काहि लोकं म्हणतात की तो काळ झाला. त्या काळात रावण नावाचा एक व्यक्ती, जो व्यक्ती प्रकांडपंडीत होता. म्हटलं जातं की त्या व्यक्तीनं आपल्या सिंहासनाखाली नऊ ग्रहांनाही दाबून ठेवलं होतं. तद्नंतर शनी त्याच्या जोखडातून निसटला व तोच त्याचेवर भारी झाला. असा व्यक्ती की ज्याला वेद, विद्या व ज्ञान प्रचंड प्रमाणात होतं. अशाही व्यक्तीचा अंत हा अतिशय दुखद झाला. त्याच्या डोळ्यांसमोरून त्याचीच मुलं, त्याचेच आप्त आणि त्याचेच भाऊ धराशायी झाले. असे स्वकीय आप्त, मुलं व भाऊ धराशायी होत असतांना त्याला कसं वाटलं असेल? याची कल्पना न केलेली बरी. हे पापकर्मच होतं की रावणाचा अंत हा अतिशय दयनीय झाला.
रावणानं कोणतं पापकर्म केलं होतं की त्याला एवढी मोठी शिक्षा मिळाली? रावणानं कित्येक साधू, संन्यासाला त्रास दिला होता. त्यानं कित्येक प्राण्यांना बंधनात ठेवलं होतं. प्रजेवर जुलूम केला होता. निरपराधांना त्रास दिला होता. ज्यांची शिक्षा त्याला नियतीनं दिली आणि तिही त्याची अतिशय दयनीय अवस्था करुन. याचाच अर्थ असा की आपले पापकर्म जसे असतील, तसाच भोग आपल्याला येणारच. त्यात बदल तो होणारच नाही. एवढंच नाही तर पापकर्माची शिक्षा ही व्याजासह मिळते.
पापकर्माबाबत एक आणखी उदाहरण. तो एक परिवार. तो व्यक्ती कलेक्टर होता व त्यानं आपल्या कलेक्टरपणाच्या ज्ञानानं स्वतःच्या घरातच पापकर्म केलं व आपल्या सासऱ्याची इच्छा नसतांना जबरदस्तीनं त्याचं अख्खं घर हडपलं. परंतु तो जेव्हा म्हातारा झाला, तेव्हा त्याच्याही जावयानं त्याला नजरकैदेत ठेवलं. तेही एका कमऱ्यात बंद करुन. शिवाय घर आपल्या नावावर केलं होतं, ते वेगळंच.
कर्म असेच फिरुन येत असतात. मग ते पापकर्म का असेना. आपले कर्म जर चांगलं असेल तर त्याचा परिणाम चांगलाच निपजतो. सुख लाभत असतं. याबाबत आणखी एक उदाहरण आहे. औरंगजेबाचं ते उदाहरण आहे. आपल्याला माहितच असेल औरंगजेबाचा इतिहास. त्यानं आपल्याच भावांची हत्या केली होती राजसत्ता हातात घेत असतांना आणि आपल्याच वडिलांना नजरकैदेत टाकलं होतं. तो ती राजसत्ता ताब्यात घेवून आलमवीर बनण्याची स्वप्न पाहात होता. त्यासाठी त्यानं प्रजेवर किती जुलूम केला. धर्माच्या नावाखाली त्यानं कित्येक लोकांचे बळी घेतले. परंतु अंत मात्र त्याचा सुखद झाला नाही. अंत हा दुर्दैवी झाला. आलमवीर तर बनताच आले नाही. शेवटी हताश, निराश होवून तो मरण पावला. महाभारतातही तेच दाखवलं आहे की ज्यांना बळाच्या भरवशावर राजसत्ता उपभोगायची होती आणि ती नशीबानं मिळालीही. तो धृतराष्ट्र आगीच्या वणव्यात भस्मसात झाला आणि त्याच्या डोळ्यासमोरुन त्याची मुलं, आप्त मरण पावलीत. आता कोणी म्हणतील की धृतराष्ट्रानं कोणते असे पापकर्म केले? धृतराष्ट्रानं पापकर्म केले नाहीत. परंतु पापकर्माचा सतत विचार त्याच्या डोक्यात असायचा. याचाच अर्थ असा की आपल्या मेंदूत जर वाईट विचार येत असतील तर त्याचाही परिणाम आपल्या जीवनशैलीवर होतो. तो वाईटच परिणाम असतो. वाटल्यास धृतराष्ट्र आपलीच स्नुषा असलेल्या द्रौपदीची अब्रु वाचवू शकला असता. परंतु त्यानं ते केलं नाही. ते कर्म तो मनाच्या चक्षूतून पाहातच राहिला. ज्याचा परिणाम जो व्हायचाच तो झालाच.
दुर्योधनाचं तर पापकर्म सर्वांना माहीतच आहे. दुर्योधन व दुःशासनानं आपल्या आईसमान असलेल्या वहिणीची म्हणजेच द्रौपदीची अब्रु लुटण्याचा प्रयत्न केला. ज्यातून त्यांचाही अंत वाईटच झाला.
कर्माचे परिणाम पडताळून पाहतांना धृतराष्ट्रचं जीवन पाहावं. धृतराष्ट्रावरुन सांगायचं झाल्यास जे लोकं वरुन चांगले जरी दिसत असतील तरी त्यांच्या मनात जर वाईट विचार येत असतील तर ते पापकर्मच असतं. त्याचाही परिणाम हा भीषणच असतो. म्हणूनच पापकर्म करु नये. तसाच पापकर्माबाबतीतील वाईट विचारही करु नये. कारण त्याचेही परिणाम तसेच निपजत असतात. हे तेवढंच खरं.
मनात जर चांगले विचार असले वा आपण मनात चांगले विचार करीत असलो तर चांगल्या विचारांचा परिणाम हा चांगलाच होत असतो. याबाबतीतही बरीच उदाहरणे आहेत. आम्रपाली, अंगुलीमाल, वाल्मीकी, विश्वामित्र, सम्राट अशोक, अशी ही बरीच उदाहरणं.
आम्रपाली एक नर्तिकाच नाही तर नगरवधूही होती. तिला नगरवधू बनवले होते. त्याच नगरवधूच्या भरवशावर तिनं कित्येक राज्यांना आपल्या स्वार्थप्रेरीत हेतूनं आपल्या पायाशी लोळण घ्यायला लावलं. ते पापकर्मच होतं. परंतु ज्यावेळेस ती तथागत भगवान बुद्धांच्या संपर्कात आली. त्यानंतर ती चांगला विचार करु लागली व तिच्या हातून कर्मही चांगलं घडत गेलं. अंतही तसाच सुखद झाला. तेच अंगुलीमालचं झालं. त्याच्याही मनातील सुविचारानं त्याच्या दरोडेशाही वृत्तीचं रुपांतर चांगल्या वृत्तीत झालं व तो एक बौद्ध भिक्षू बनला. वाल्मिकी तर सर्वांनाच परिचीतच आहे. ज्यांनी रामायणाची रचना केली. तेही पुर्वी दरोडेखोर होते. परंतु चांगल्या विचारानं त्यांच्याही मनातील कुविचारांचं परिवर्तन झालं. सम्राट अशोक व विश्वामित्रही राजे होते. ज्यांनी खुप नरसंहार केला होता. युद्धातील नरसंहार पाहून त्यांच्या मनात पश्चाताप झाला व सुविचारांची पेरणी झाली व ते सदाचारी व सुविचारी बनले. महत्वपूर्ण बाब ही की चांगल्या वागणुकीचा परिणाम चांगलाच होतो. त्याचं चांगलं फळंही मिळत असते. अन् आपलं वागणं जर चांगलं नसेल तर त्याचे परिणाम हे त्वरीत दिसत नाहीत. ते परिणाम तद्नंतर दिसून येत असतात. त्याचे गंभीर परिणाम घडून येत असतात. त्याचप्रमाणे आपल्या मनातील विचार कसे आहेत. यावरुन आपल्या मनाची जडणघडण होत असते. म्हणूनच आपलं जसं वागणं चांगलं असावं. तसेच आपल्या मनातील विचारही चांगलेच असावेत. जेणेकरुन त्यातून आपल्या समाजाचं भविष्य घडवता येईल.
देवलाही तसंच वाटत होतं. आपण समाजातील एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणून आपण आपली भुमिका चांगली ठेवली नाही. असेच पापकर्म करीत राहिलो. आपण आपलं कर्तव्य केले नाही तर भविष्यात त्याचा गंभीर परिणाम व ते भोग आपल्यालाही भोगावे लागू शकतात. कोणाला दुर्धर व्याधी रुपानं, कोणाला तीव्र संकटाच्या रुपानं तर कोणाला इतर अनेक कारणानं. म्हणूनच असं होवू नये म्हणून आपण विवाह केल्यानंतर सासरी गेल्यानंतर चांगलंच वागावं. त्यातून आपलंच भविष्य चांगलं बनू शकेल आणि समाजाचंही भविष्य चांगलं घडू शकेल. तसाच देशाचाही विकास करता येवू शकेल.
देवच्या मतानुसार मंजूचं वागणं चांगलं नसल्यानं मंजू वेश्यालयाची शिकार झाली होती. तसंच तिला माणसं ओळखणं जमलं नसल्यानं तिनं देवला सोडलं होतं. ते झालं मंजूचं जीवन. ती जाणूनबुजून वेश्यालयात गेली नव्हती तर तिला प्रारब्धानं वेश्यालयात टाकलं होतं. आज समाजही तसाच होता. मुलींना जास्त पैसा कमविण्याचा हव्यास असायचा. त्यांना कमी परिश्रमात जास्त पैसा कमविण्यासाठी कोणतीच पर्यायी साधनं दिसायची नाहीत. परीश्रम वा कष्ट करण्यात त्यांच्या नाकीनव यायचे. अशातच त्या वेश्याव्यवसाय करायच्या. ज्यातून कमी परिश्रमात जास्त पैसा कमविता यायचा. परंतु हे जरी खरं असलं तरी तो पैसा हा लाभदायक नसायचा. त्यातून व्याधी निर्माण व्हायच्या. मंजूचंही तेच झालं होतं.
आज मंजू म्हातारी झाली होती. डोळ्याला कमी दिसत होतं. चेहर्यावर सुरकृत्या पडल्या होत्या. केसं पिकलेले होते. त्यातच तिला दुर्लभ अशा व्याधीनं जखडलं होतं. आज तिला सर्व आठवत होतं. आठवत होता तो काळ. ज्या काळात तिनं विवाहाला महत्व दिलं नव्हतं. देवला सोडून दिलं होतं, अनंत प्रकारच्या वेदना देवून.
मंजूजवळ आजमितीस गाडी व घरही नव्हतं. ज्यांनी तिला विकत घेतलं होतं. त्यांनी तिचं तरुणपण होतं. तेव्हापर्यंत तिचा उपयोग करुन घेतला होता. परंतु तद्नंतर तिला भाकड गाईसारखं फेकून दिलं आणि ज्यावेळेस फेकून दिलं होतं. त्यानंतर तिच्यावर भीकच मागायची पाळी आली होती. बरं झालं की ती मेहनती होती. तिच्यात कौशल्य होतं. ज्या कौशल्याच्या भरवशावर तिनं जीवनाच्या तशाही अवस्थेत तग धरला. आज तिनं आपला वेश्यापणाचा धंदा सोडला होता. अन् तसा धंदाही ती कशी काय करणार होती? तिच्याच्यानं तो धंदा म्हातारपण आल्यानं जमत नव्हता. शेवटी तिनं ठरवलं. आपल्याला जगायचं आहे ना. मग एकच काम करा. गोव्यात प्रवासी बहुसंख्येनं येतात. त्यांना पाणीच पाजा. चार पैसे येतील. त्या पैशात आपले पोट भागवा.
मंजू गोव्याच्या समुद्रात पाण्याच्या बाटला विकत फिरत होती. आज तिला गतकाळात झालेला तिचाच विवाह विवाह आठवायचा. अन् आठवायचं ते नाव. जे तिनं कधीतरी तिच्या नशीबावर कोरलं होतं. ते नशीब की ज्या नशिबानं तिला मदत केली नव्हती.
मंजूचं प्रारब्धच तसं होतं की ज्या प्रारब्धात तिची बुद्धी चालली नाही. तिच्यावर अतिशय प्रेम करणारा तिचा पती तिला त्यावेळेस आवडला नाही. ती त्याला सोडून गेली. तेव्हा तिला कोणीच समजावून सांगीतलं नाही.
करुणाही पश्चाताप करीत होती देवशी विवाहाचा करार केल्यानं. कारण देवनं तिच्याशी गांधर्व विवाह केला असला तरी तो आजच्या समाजात चालत नव्हता. काळ बदलला होता व लोकं राजरोषपणे केलेल्या विवाहावर विश्वास ठेवत होते. गांधर्व विवाहावर नाही. त्यामुळंच तिला तिच्या विवाहाबद्दलच पश्चाताप होत होता. त्यातच तिला देवचा पदोपदी राग येत होता. जरी देव तिला सुखात ठेवत असला तरी. देवही त्याच विवाहाबद्दल पश्चाताप करीत होता. जो विवाह त्याला करता आलेला नव्हता. ज्यात त्यानं करुणाला आश्वासन दिलं होतं. जे आश्वासन त्याला पाळता येत नव्हतं. पाळताही आलं नव्हतं.
***********************************************************************समाप्त***********