Vivaah - 5 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | विवाह - भाग 5

Featured Books
Categories
Share

विवाह - भाग 5

           

           देव थांबता थांबता बरेच दिवस थांबला. त्याला आपल्या आईचा प्रश्न सतावत होता. ती जास्त म्हातारी होत चालली होती. त्यातच त्यानं गांधर्व विवाह केला व जिच्यासोबत विवाह केला. तिला आश्वासन दिलं होतं की तो मंजूच्या प्रकरणापासून मुक्त झाला की तिच्याशी विवाह करेल.
            ती मंजू....... मंजू देवला हुंगत नव्हती. तशी ती भावही देत नव्हती. त्याला मात्र मंजूची आठवण यायची व तो तिला भेटायला जायचा. परंतु ती सतत अपमानीत करीत होती त्याला. तसा काळ पालटला. त्यानं गांधर्व विवाह का होईना केला. तद्नंतर त्यानं मंजूकडे जाणंच सोडलं. त्यानं करुणाशी विवाह केला होता व तो करुणासोबत संसारात रममाण झाला होता. आता ना त्याला मंजूची आठवण येत होती. ना तो तिच्या घराकडे तिला भेटायला जात होता.
             बरेच दिवस झाले होते. मंजू बाळंतपणातून सावरली होती. त्यातच तिनं जाणून घेतलं होतं की सतत येणारा तिचा पती देव आजकाल तिला भेटायला येत नाही. त्यातच तिला चिंता पडली होती की सतत अपमान सहन करुन तिला भेटायला येणारा तिचा पती आजकाल तिला भेटायला येत नाही. त्याच चिंतेनं ग्रस्त असतांना ती त्याच्या घराकडे जात असे व दुरुनच न्याहाळून पाहात असे. घरात कोण कोण असतात याचं निरीक्षण करीत असे.
           मंजूचं निरीक्षण. त्या निरीक्षणादरम्यान तिला आढळून आलं की देवच्या घरात एक महिला दिसत आहे. जी तरुण आहे. त्यातूनच तिला गवसलं की कदाचीत देवनं विवाह केला असेल. त्यानं आपल्या घरी झालेला त्याचा अपमान पाहून विवाह केला असेल. ज्यात त्यानं आपली वाट पाहिली नाही. 
             मंजूनं त्याच्या घराकडे प्रत्यक्ष येवून त्या घराचं निरीक्षण केलं. हे दोनचार वेळा निरीक्षण केलं. त्यातच तिला त्याची आठवण यायला लागली. पश्चातापही व्हायला लागला. काय करणार. आता तिच्याकडे पश्चातापाशिवाय मार्ग नव्हता. शिवाय आता ती परतही येवू शकणार नव्हती. त्यातच त्याचा रागही भयंकर येवू लागला होता. मग काय, तिनं त्याला फसविण्याचं ठरवलं. ठरवलं की त्याची तक्रार पोलीस स्टेशनला करु म्हणजेच तो फसेल. त्याला पोलीस पकडून नेतील व चौकशी न करता कैदेत टाकतील. तसा कायदाच उपलब्ध होता.
            तो तिचा विचार. त्याचं कारण होतं, त्यावेळचे कायदे. त्या कायद्यानुसार एखाद्यावेळेस एखाद्या महिलेनं पोलीस स्टेशनला तक्रार करताच पोलीस प्रशासन त्याची शहानिशा न करता सरळ त्यांना तुरुंगात पाठवत असत. त्यांची जमानतही शक्यतोवर होत नसे. त्याचाच फायदा घेण्याचं मंजूनं ठरवलं व ती एक दिवस पोलीस स्टेशनला गेली.
            मंजू पोलीस स्टेशनला गेली. तिच्या मनात त्याचेबद्दल वाईट विचार होता. तशी शिफारसही तिनं पोलीस स्टेशनला केली. मात्र देवचं नशीब चांगलं होतं. पोलिसांनी विचारलं, 
           "तुझी तक्रार महिला सेलला होती काय?"
           "नाही."
           "मग जा. तेथून लिहून आण."
           तो पोलिसांनी तिला तक्रारीसंदर्भात लिहून आणण्याचा आदेश देताच ती घाबरली व परत म्हणाली,
           "अमूक अमूक ठिकाणी महिला सेल केलं होतं मी."
           "मग काही हरकत नाही. लिहून आण." पोलिसांनी म्हटलं.
            तो लिहून आणण्याचा प्रस्ताव नव्हे तर पोलिसांचा आदेशच. तशी ती महिला सेलला गेली व तिथे असलेल्या अधिकारी ताईला तिनं ती गोष्ट सांगितली. त्यावर महिलासेलची ताई म्हणाली,
           "आतापर्यंत झोपली होती काय, बोलावलं होतं तेव्हा? आता मी कसं लिहून देवू?"
            ते महिला सेलच्या अधिकारी मॅडमचं उत्तर. ती अधिकारी मॅडम तिला सुनावत होती. कारण मंजू घरी परत येत नसल्यानं त्यानंच ती तक्रार पोलीस स्टेशनला टाकली होती. ज्यात ती हजरच झाली नव्हती. त्यामुळं ती केस एकतर्फी लागली होती. म्हणजेच ती त्याचेच बाजूने लागली होती.
           महिला सेलच्या मॅडमनं तिला काहीही लिहून दिलं नाही. उलट तिला चांगलं सुनावलं. त्यातच पोलिसांनी तिला महिलासेलच्या अधिकारी मॅडमकडूनच लिहून आणायला लावलं. त्यामुळंच ती भयंकर चिडली व चिडलेल्या मनानं ती त्यांच्या विवाहाच्या मधील व्यक्तीकडे गेली. त्याला आपलं मत सांगितलं. मला घटस्फोट हवाय. मला माझं आंधनही हवंय. कारण तो हुंडा मागतोय. 
           हुंडा प्रकरण. तसा देवनं हुंडा मागितलाच नव्हता. मात्र तिनं त्याचेवर आरोप केला होता. त्यातच ती मधील व्यक्तीजवळ जमेची बाजू बोलली. शेवटी मधील व्यक्तीनं सांगितलं की घटस्फोट होईल. परंतु तिच्या सर्व अटी बाजूला ठेवून. 
            तो मधल्या व्यक्तीचा निर्णय. तिला तोही निर्णय ऐकावासा वाटत नव्हता. परंतु तिला आता माहीत होतं. आपण देवच्या घरी जावू शकत नाही. त्यानं पत्नी केलेली आहे. मी जर त्याच्या घरी जाईल, तर मला तो फार त्रास देणार. कारण मी त्याला फार त्रास दिलेला आहे. शेवटी आपलीच चूक आहे. तडजोड तर करावीच लागेल आणि ती तडजोड मलाच करावी लागेल. आपण लटकून राहू नये. त्याला मात्र लटकवून ठेवावं. असा विचार करुन तिनं पाऊल टाकणं सुरु केलं होतं.
            मंजूचा तो स्वार्थ विचार. ती मधल्या व्यक्तीला घेवून त्याचेकडे आली. तिनं तो विचार मधील व्यक्तीकडून बोलून दाखवला व मधल्याच व्यक्तीनुसार परस्पर घटस्फोट घेतला व आंधनही. परंतु तो घटस्फोट कायद्याच्या चौकटीतील नव्हता. तो समाजाच्या दोनचार लोकांच्या हस्ते झाला होता. ज्यातून पुरुष असलेला देव लटकला होता. ती स्री असल्यानं त्यातून मोकळी सुटली होती.
             तीन वर्ष झाले होते. मंजू एका कार्यक्रमादरम्यान त्याला भेटली. तो आता लठ्ठ झाला होता. तरीही चेहरा न बदलल्यानं तो ओळखू येत होता. ती मात्र थोडी बारीक झाली होती. चेहरा थोडा काळवंडला होती. ती जवळ आली. म्हणाली,
            "कसा आहेस?"
            "ठीक आहे."
            "तू कशी काय आहेस?"
            "ठीक आहे."
            "एक विचारु का?" ती परत म्हणाली.
            "विचार."
            "मला परत यायचं आहे. तुझ्याच घरी यायचं आहे. येवू का?"
            तिचा तो प्रश्न. त्यावर त्याला आठवला त्याचा भूतकाळ. तिनं त्याला दिलेला महाभयंकर त्रास. त्यातच त्याचा तिच्या घरी सतत होणारा अपमान. तो अपमान सहन होणारा नव्हताच. त्यानं विचार केला व विचार करीत शांतपणे उत्तर देत तो म्हणाला,
          "नको येवूस. आता बरीच वेळ निघून गेली आहे."
          "मग मोबाइल नंबर दे."
          "कशाला?"
          "तुझ्याशी बोलायला."
          "तोही मी देवू शकत नाही."
          "का?"
          "अगं आता तू माझी पत्नी राहिली नाहीस."
          त्यानं तिला स्पष्ट म्हटलं. तशी ती चूप झाली. तिला आपण केलेल्या चुकीबद्दल दुःख वाटत असेल. असंच वाटत होतं. शेवटी न राहवून तो म्हणाला,
            "बरंय. आता निघतोय."
            "निघतोस. एवढ्या लवकर."
            "होय, जावंच लागेल. कारण आता माझी कोणीतरी वाट पाहणारी घरी आहे आणि इवलीशी मुलगीही आहे मला."
            "हो काय?"
            "होय." 
            "आता केव्हा भेटणार?"
             "तू भेटूही नकोस आणि माझ्या संसारात वितुष्ट आणूही नकोस आता. ठीक आहे मी निघतोय." तो म्हणाला व तेथून तो ताड्कन निघाला. ती मात्र त्याचेकडे अश्रुभरल्या नजरेनं पाहात होती. तो तिच्या डोळ्यासमोरून ओझल होईपर्यंत. 
           आज बरेच वर्ष झाले होते. ते दोघंही भेटले नव्हते. तसा देव संसारात खुशच होता. त्याच्या पत्नीसोबत व मुलीसोबत. परंतु जेव्हा तो एकटा असायचा. तेव्हा त्याला तिची आठवण यायची. अन् ती एखाद्या फुलपाखरासारखी दूर उडून गेली होती.
            विवाह कायदा. या कायद्यावर अलिकडील काळात विचार करण्याची गरज आहे. कारण पाश्चिमात्य काळ आहे व आज बराच बदल झालेला आहे. विवाह कायदे कालचे आहेत आणि ते कालच्या परिस्थितीनुसार बनवलेले आहेत. त्यामुळं ते कालच्या परिस्थितीला लागू होते. ते आजच्या परिस्थितीला लागू नाहीत. 
           देशानं असे कायदे का ठेवावे की ज्या कायद्यातून आजच्या बदलत्या काळानुसार पुरुषवर्गाच्या विवाह स्वातंत्र्याची गळचेपी होईल. हे कायदे जेव्हा बनविण्यात आले. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. शिवाय त्यावेळेस तसा कायदा बनविणे गरजेचे होते. परंतु आता! आता त्या कायद्याची काहीच आवश्यकता नाही. गरजेनुसार व परिस्थितीनुसार ते कायदे कालबाह्य करावे. कारण ज्यावेळेस तसे कायदे बनले, ज्यावेळेस स्री पुरुष समान नव्हते. शिवाय स्रियांना पुरुष मंडळी आपल्या हातची कळसुत्री बाहुलेच समजायची. तिचा हक्कं मारायची. अन् तिही सगळं सहन करायची. कारण ती जास्त शिकलेली नसायची. मात्र आज तसं नाही. आजची स्री शिकत आहे. उच्च शिक्षण घेत आहे. ती आज नोकरीही करु लागली आहे. शिवाय कायद्यानं तिला जो समानतेचा अधिकार दिला आहे. त्या अधिकाराचा ती पुरेपूर वापरही करीत आहे. असे असतांनाही सरकार पुरुषांनाच दोषी ठरवत आहे. त्यांचे हक्कं हिरावत आहे. त्यांना न्यायालयामार्फत त्रास देत आहे. त्यांच्या अब्रुचे धिंडवडे काढत आहे. ती सक्षम असतांनाही तिला घटस्फोटाच्या प्रक्रियेतून खावटी देत आहे. 
          आज स्री सबळ व सक्षम झाली आहे. असं वाटत आहे नव्हे तर सक्षमच झाली आहे. काही स्रिया अशाही आहेत की ज्या सक्षम नाहीत. परंतु घटस्फोटासाठी न्यायालयीन प्रक्रियेचा वापर कोण करतं. याचं जर सर्वेक्षण केलं गेलं तर साहजीकच असंच आढळून येईल की न्यायालयीन घटस्फोट प्रक्रियेचा वापर तीच महिला करीत आहे. जी आर्थिक आणि सर्वांगीण दृष्ट्या सक्षम झाली आहे व जिला खावटी या पर्यायाची गरज नाहीच. आजची कोणतीही स्री पतीच्या घरातून निघून गेल्यावर पुर्वीच्या स्रीसारखी केवळ आपल्या आईवडीलांच्या घरी आश्रीत म्हणून न राहता कामावर जात असते. कारण आजच्या काळात कोणतीही स्री ही पतीच्या घरुन निघून जाताच जेव्हा माहेरी जात असते. तेव्हा तिच्या माहेरची मंडळी तिला रिकामी पोषत नाहीत. ते जबरदस्तीनं कामाला पाठवत असतात. ती तिथून कामाला जावून स्वतःचा उदरनिर्वाह करीत असते. त्यामुळंच तिला कोणत्याही स्वरुपाची खावटी न देण्याचा विचार अलिकडील काळात व्हावा व नवीन कायदे बनवावेत. जेणेकरुन कोणीच निदान खावटी या पर्यायासाठी तरी न्यायालयात जाणार नाही. अन् खावटी मिळते म्हणून आज लोकं न्यायालयात जातात. जर तीच खावटी विवाह कायद्याअंतर्गत सरकारनं मिळवून देणंच बंद केलं तर कोणीच न्यायालयाचे दार ठोठावणार नाही. न्यायालयात घटस्फोट घेण्यासाठी जाणारेही कमी असतील.
           आज काळ बदललेला आहे व जुन्या कायद्याला पुष्कळ वर्ष झाल्यामुळे जुन्या कायद्यालाच अनुरुप नव्या स्वरुपाचा रुपांतरीत कायदा बनविण्याची गरज आहे. कालचे जुने कायदे आजच्या परिस्थितीला लागू नाहीत. आज परिस्थिती बदलली तरी त्याबाबत कायदे जुने आहेत व जुन्याच कायद्याचा वापर करुन आजच्या स्रिया पतीला सोडून पतीच्या घरुन निघून माहेरी जातात व पतीला सतावतात. आरोप लावत असतात. त्येतच ते जुन्या बुरसट कायद्याचा वापर करुन गैरवापर करतात. एकदोनच अपवादात्मक प्रकरणं आहेत की ज्यात हुंड्यासाठी महिलांना मारलं जातं. परंतु हे जरी खरं असलं तरी बॉयफ्रेंडच्या नादात कितीतरी स्रियांनी पुरुषांची हत्या केल्याचीही प्रकरणं काही कमी नाहीत. तिही प्रकरणं वर्तमानपत्रातून छापून येत असतातच. 
         महिला विवाह करतात. परंतु लागलीच विवाहानंतर त्या माहेरी येतात. सासरी नांदत नाहीत. कारण काही महिलांना घरकामाचा कंटाळा येत असतो. शिवाय त्यांना माहीतच असते की समजा मी वडिलांच्या घरी बसूनही राहिले तरी माझा उदरनिर्वाह पतीच्या कडून मिळणाऱ्या खावटीने चालेल. मला काम करण्याची कोणतीच गरज नाही. अशी मानसिकता ठेवून त्या फारकत घेतात. परंतु माहेरी गेल्यावर जे चटके मिळतात. त्यानंतर बसून खाता येत नाही. कामावर जावंच लागतं.
         आजच्या काळात स्रियाही कमजोर नाहीत त्यांना कोणीही कमजोर समजत नाही. त्या आजच्या काळात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जीवन जगत असतात. त्यामूळं कोणतीच स्री ही माहेरी असो की सासरी असो, बसून आपला उदरनिर्वाह करीत नाही. ती काही ना काही कामं करीतच असते. अशावेळेस आजच्या काळात ती हतबल आहे, कमजोर आहे, असं समजून व आपली मानसिकता अशी करुन कायद्यानं तिला खावटी का द्यावी? स्री आणि पुरुष समान आहेत ना. मग तिची खावटी न्यायालयानं मंजूर का करावी? ती बंदच करावी व पुरुषवर्गांना राहत द्यावी. परंतु न्यायालय असे करीत नसल्यानं घटस्फोटाचे वाढते प्रमाण चिंताजनक वाटत आहे. 
         देवला विचार आला होता. आज अशा बऱ्याच स्रिया अशा आहेत की ज्या अशाच स्वरुपानं वागून पतीला त्रास देत आहेत. माहेरी गेल्यानंतर खावटी हा एकमेव आधार असल्यानं त्या नावापुरता विवाह करीत असतात. अन् विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी ताबडतोब पतीला सोडून पतीच्या घरुन निघून जावून खावटी व घटस्फोटाचा अर्ज करीत असतात. त्यातल्यात्यात त्या आपल्या माहेरी ऐषआरामाचं जीवन जगत असतात. म्हणूनच आज काळ बदलल्यामुळं सरकारनं कायद्यात सुधारणा करुन नवीन कायदे बनवावेत. त्यात खावटी कलम टाकूच नये. खावटी जर नसेल तर शक्यतोवर कोणीच पतीला सोडून माहेरी जाणार नाही. जिला खरंच त्रास आहे, तीच जाईल व ती गेल्यानंतर चूप बसत नाही. ती स्वतःचं उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करतेच. ती खावटी मागत नाही व खावटीमुळे आज जे घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे. ते प्रमाणही नियंत्रीत करता येते. खावटीमुळंच खरंतर खटले निर्माण होत असतात व त्या खटल्यांचे प्रमाणही वाढत असते. सरकारनं खावटी देण्याचा कायदा रद्द करुन त्यात थोडा बदलाव करावा. ज्यावरुन घटस्फोट थांबतील. संसार चांगला चालेल. यासाठी विशेष करुन समुपदेशन करावे. खावटीचा कायदा शक्यतोवर रद्दबादल करावा. जेणेकरुन बहुतःश स्रिया खावटी मिळेल म्हणून पतीला सोडून वेगळ्या चुली मांडणार नाहीत. त्या संसार तोडून जाणार नाहीत व संसार टिकेल हे तेवढंच खरं. कारण अलिकडील काळातही संसार टिकविण्याची गरज आहे. त्यामुळं हुंडा देवूच नये, संसार तुटतो. 
            हुंडा देवूच नये म्हणजे हुंडाबळी प्रकरणं घडणार नाहीत. परंतु आपण आपल्या मुलीचा संसार व्यवस्थीत चालावा म्हणून हुंडा तिला मदत म्हणून देत असतो आणि आपण आपल्याच हातानं तिला हुंडाबळीच्या डोहात ढकलत असतो. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
         एक हुंडाबळी प्रकरण. एका शहरात एका महिलेचा हुंड्यासाठी बळी घेण्यात आला. म्हणतात की तिचं प्रेम होतं पतीवर. म्हणूनच तिच्या वडिलांनी तिची इच्छा गृहीत धरुन तिचा विवाह करुन दिला. विवाह करतांना हुंडा म्हणून त्यांनी एक्कावन तोळे सोनं व एक फॉर्च्युनर कार व चांदीची गौराई दिली. त्यानंतर विवाह झाला व विवाह झाल्यानंतर तो व्यक्ती दोन कोटी रुपये मागत होता आणि ते मिळत नसल्यानं सासरकडील व्यक्ती त्यांच्यावर अत्याचार करीत होते. 
          ती स्री मरण पावली नव्हे तर मारली गेली. त्यानंतर शवविच्छेदन अहवाल आला. त्या अहवालात तिला तिच्या पतीनं व सासरच्या काही लोकांनी तिला पाईपनं मारल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर ती मरण पावताच सासरकडील काही लोकं फरार झालेत. 
          ती स्री मृत झाली. तिच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी सांगितलं की तिनं प्रेमविवाह केला होता व मी स्वखुशीनं त्यांना गाडी व इतर वस्तू दिल्या. हे जरी त्या स्रिच्या वडिलांनी स्वखुशीनं केलं असलं तरी इथंच सारं चुकलं. ती गाडी, एक्कावन तोळे सोने, चांदीची गौराई. यासारख्या महागड्या वस्तू पाहून त्या प्रकरणात तिच्या सासरकडील परिवारांना लोभ सुटला असेल व ठरवलं असेल की जो व्यक्ती एक्कावन तोळे सोनं देवू शकतो. महागडी कार देवू शकतो. चांदीची गौराई देवू शकतो. त्या व्यक्तीकडे भरपूर संपत्ती असेल व त्याला आता आपण कितीही पैसा मागितला तर तो देईलच. असा विचार करुन त्यांनी लागलीच दोन कोटी रुपये मागितले. जी रक्कम देणं म्हणजे वधुपित्यांकडे आव्हानच असेल. कारण विवाह करतांना वधू पक्षांना काय काय करावं लागतं ते त्यांचं त्यांनाच माहीत असतं. ते प्रसंगी कर्ज काढत असतात. कारण त्यांच्यापुढं लक्ष असतं त्यांचं बाळ व त्या बाळाचा आनंद. त्यांना त्या बाळाची खुशी करणं महत्वाचं वाटतं. म्हणूनच वधुपिते विवाहात लाखो रुपये खर्च करीत असतात. वरपित्यांनाही तसंच वाटतं. म्हणूनच तेही खर्च करतातच. शिवाय ते वधुपित्यांना आवर्जून सांगतात की त्यांनी अमूक अमूक करावं. माझे पाहुणे निराश होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि तशी कमतरता आढळू नये.
          वरपित्यांनी सांगितलेल्या वधुपित्यांना सूचना. आपली मुलगी सुखी राहावी म्हणूनच ते सर्व सूचनांचं पालन करीत असतात. ते विवाह अशा थाटामाटात करतात की त्यात कोणताच कमीपणा ठेवत नाहीत. प्रसंगी कर्ज काढतात आणि जे कर्ज काढतात, ते कर्जही वरपित्यांना सांगत नाहीत. केवळ आपल्या बाळाची खुशी व आपल्या बाळाची काळजी. त्या बाळाला सासरी एवढासाही त्रास होवू नये. परंतु पुढं त्यात समस्या निर्माण होते. समस्या अशी असते की विवाह झाल्यानंतर लोभ सुटतो वरपित्यांना. मग ज्या गोष्टी करु नये, त्या गोष्टी वरपिते करतात. 
          त्या स्रिच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तिच्या सासरकडील परिवारानंही तेच केलं. जो इतर वरपिता करतो. त्यालाही लोभ सुटला, जो इतर वरपित्यांना सुटतो. ज्यातून तिची हत्या करण्याचं धाडस केलं गेलं होतं.
         खुशी...... बाळाची खुशी...... साऱ्याच वधुपित्यांना वाटत असते की आपल्याही बाळाची खुशी व्हावी. तिला सासरी त्रास होवू नये. म्हणूनच एक्कावन तोळे सोने, चांदीची गौराई व महागडी गाडी देण्यासारख्या गोष्टी वधुपिते करीत असतात. ते हुंडा म्हणून ती रक्कम देत नाहीत, तर आपल्याच मुलीला तिच्या संसारात त्या गोष्टीचा वा रकमेचा आधार होईल या हेतूनं वधुपिते त्या वस्तू देत असतात. हा हुंडा नसतोच तर एक मदत असते. परंतु त्या मदतीचा गैरफायदा घेत काही वरपक्ष त्या गोष्टीचा नाजायज आपल्या स्वार्थासाठी फायदा घेतात. त्यापेक्षा तशा प्रकारच्या रकमा वडिलांनी दिल्या नाही तर कदाचीत हुंडाबळीच्या समस्यांवर अंकुश तरी थोड्या प्रमाणात लावता येवू शकतो. शिवाय विवाह करतांना वधुपित्यानं भिवून नाही तर ठासून सांगायला हवं की आपण अमूक अमूक गोष्टींची मागणी पुर्ण करीत नाही. आपण कृपा करुन माझी मुलगी मागू नका. जो अमूक अमूक गोष्टी मागत असेल तर त्याला माझ्याघरी जागा नाही. तसंच मुलींसाठी जास्त अपेक्षेचा पती शोधून त्यांच्याशी विवाह लावून देवूच नये वधुपित्यांनी. कोणताही व्यक्ती, जो आपल्या मुलींना सुखी ठेवू शकत असेल त्याच मुलाला मुलगी द्यावी. कदाचीत तिच्या आईवडिलांनी तिला एखाद्या गरीब मुलाला दिली असती व एक्कावन तोळे सोने, महागडी गाडी व गौराई दिली असती तर त्यानं तिला राणी बनवून ठेवलं असतं. कोणताच त्रास दिला नसता. परंतु आजचे वधुपिते तसं करीत नाहीत. तिथंच चुकत असतं. त्यानंतर मागण्यावर मागण्या सुरु होतात. त्यातून मागण्या पुर्ण झाल्या नाहीत तर मग हत्या होत असते. त्या मृत महिलेचं प्रकरण काहीसं असंच आहे. 
         अशीच हुंडा प्रकरणं व हुंड्यातून घडणारी प्रकरणं. काही ठिकाणी हुंडा मागणी होत असेल तर घटस्फोट होतो. मग आरोप लावले जातात. परंतु हुंडाच दिल्या गेला नाही तर ना हत्या होतील, ना हुंडे दिले गेल्याचे आरोप लावता येतील. मात्र हे जरी खरं असलं तरी आज आपण सावधगिरीची भुमिका घेत नाही. जी घेण्याची अतिशय मोठ्या प्रमाणावर गरज आहे. हुंडा देवूही नये व घेवूही नये. तो गुन्हाच आहे. अन् आपण तो गुन्हाच करीत असतो. शिवाय असा गुन्हा आपल्याकडून घडलाच तर त्यावर उपाय नाही. कारण गेलेला जीव हा कधीही परत येवू शकत नाही. 
           देव त्यावर विचार करीत होता. हुंड्यातूनही घटस्फोट होत असतात. न्यायालयात चार्जशीटा दाखल होत असतात. आरोपावर आरोप लावले जातात. मग ठरवलं जातं की हुंडा देणं घेणं गुन्हा आहे. आपण तो घेतलाच कसा आणि दिलाच कसा? हे सर्व प्रश्न. हे प्रश्न उमेदवार जीवंत असला तर..... संपल्यावर सारंच संपतं. त्या खटल्याचाही काहीच फायदा नसतो. 
          घटस्फोट...... अलिकडील काळात घटस्फोटाचे खटले वाढत आहेत. हुंडा व खावटी जर सुरु राहिली तर हे प्रमाण आणखी वाढू शकते यात शंका नाही. आज जे कोणते घटस्फोटाचे खटले न्यायालयात सादर होत आहेत. त्यातील शंभर प्रतिशत खटल्यांपैकी बऱ्याचशा खटल्यात हुंडा व खावटी हेच महत्वपुर्ण मुद्दे असतात. बाकीचेही इतरही मुद्दे असतातच. जसे लैंगिक छळ केला. मानसिक त्रास दिला. ही सर्व कारणं असतात. परंतु वास्तविकता वेगळीच असते. वास्तविकता तपासली असता असं आढळून येते की काहीच घडलेलं नाही. जसं हुंडा प्रकरण. हुंडाबळी प्रकरणात हुंडा घेणारा जसा दोषी असतो. तसाच दोषी असतो हुंडा देणारा. हुंडा मागणी होण्यापेक्षा हुंडा देवूच नये. विवाहापुर्वीच कोणी हुंडा जर मागत असेल, तर त्याची रितसर तक्रार आधीच पोलीस स्टेशनला द्यावी. हुंड्याची रक्कम थेट देवू नये. मग स्वखुशीनं का असेना. तशी कायद्यातही तरतूद आहे व कायदेही तेच सांगतात. परंतु आपण कायद्याचं पालनच करीत नाही. त्यानंतर जे घडतं. त्यानं आपल्याला पश्चाताप होतो. तद्नंतर त्यावर उपाय नसतोच. 
           हुंडा देणे घेणे यावर बंदीचा हा कायदा असतांना लोकं कोणी हुंडा मागितल्यावर थेट रक्कम हुंडा म्हणून देत असतात. त्यानंतर लोभ सुटतो व जशी लोभात हानी होते असं म्हणतात, त्याप्रमाणे आणखी रक्कम त्यांना माहेरकडून हवी असते. ज्यात वाद होत असतात. ज्यातून कलह निर्माण होतो व जीव जातो. त्यामुळंच वधू पक्षानं हुंडा प्रकरणातही सावधान झालेलं बरं. हुंडा जर कोणता वरपक्ष विवाहापुर्वीच मागत असेल तर विवाहापुर्वीच असा विवाह करु नये. अशा घरी कोणीच मुलगी देवू नये. ज्यातून मुलीला त्रास होईल व त्यातून घटस्फोट होईल वा आपल्या मुलीचा जीव जाईल. 
         एकंदरीत शहानिशा व विचार केल्यास हुंडा पद्धतीवर दोषी हुंडा मागणारे जसे असतात. तसेच दोषी असतात हुंडा देणारेही. खरं तर हुंडा देवूच नये. तशी प्रतिज्ञाच करावी वधूपक्षानं. अन् कोणी हुंडा मागत असल्यास त्याला सोडूच नये. हे कार्य विवाहापुर्वी करावं. विवाहानंतर नको. आपण जर असेच वागलो, वागत राहिलो, तर त्यामुळं आपल्यावर पुढं पश्चातापाची वेळ येणार नाही व आपल्या मुलीचा संसारही व्यवस्थीत राहू शकेल. यात शंकाच नाही.
          आज देव विचार करीत होता विवाहाच्या प्रश्नावर व तो विचार होता हिंदू विवाह कायद्यावर. देशानं असा कायदा का बनवावा की ज्या कायद्यातून पुरुषवर्गाच्या विवाह स्वातंत्र्याची गळचेपी होईल. हा कायदा जेव्हा बनविण्यात आला. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. शिवाय त्यावेळेस तसा कायदा बनविणे गरजेचे होते. परंतु आता! आता त्या कायद्याची काहीच आवश्यकता नाही. गरजेनुसार व परिस्थितीनुसार तो कायदा कालबाह्य करावा. तो कायदे बदलायला हवा. नवे नियम व नव्या स्वरुपात तो कायदा यायला हवा. कारण ज्यावेळेस तसा कायदा बनला, त्यावेळेस स्री पुरुष समान नव्हते. शिवाय स्रियांना पुरुष मंडळी आपल्या हातची कळसुत्री बाहुलेच समजायची. तिचा हक्कं मारायची. अन् तिही सगळं सहन करायची. कारण ती जास्त शिकलेली नसायची. मात्र आज तसं नाही. आजची स्री शिकत आहे. उच्च शिक्षण घेत आहे. ती आज नोकरीही करु लागली आहे. शिवाय कायद्यानं तिला जो समानतेचा अधिकार दिला. त्या अधिकाराचा ती पुरेपूर वापरही करीत आहे. असे असतांनाही सरकार पुरुषांनाच दोषी ठरवत आहे. त्यांचे हक्कं हिरावत आहे. त्यांना न्यायालयामार्फत त्रास देत आहे. त्यांच्या अब्रुचे धिंडवडे काढत आहे. ती सक्षम असतांनाही तिला घटस्फोटाच्या प्रक्रियेतून खावटी देत आहे. 
          आज स्री सबळ व सक्षम झाली आहे. असं देवला वाटत होतं. त्याच्या मतानुसार आजची कोणतीही स्री पतीच्या घरातून निघून गेल्यावर पुर्वीच्या स्रीसारखी केवळ आपल्या आईवडीलांच्या घरी आश्रीत म्हणून न राहता कामावर जात असते. असंही देवला वाटत होतं व ते खरंही होतंच. कारण आजच्या काळात कोणतीही स्री ही पतीच्या घरुन निघून जाताच आपल्या माहेरी जात असे व ती तेथून कामाला जावून स्वतःचा उदरनिर्वाह करीत असे. त्यामुळंच तिला कोणत्याही स्वरुपाची खावटी न देण्याचा विचार न्यायालयानं करावा. असंही देवचं म्हणणं होतं. तसा काळ बदलला व जुन्या कायद्याला पुष्कळ वर्ष झाल्यामुळे नव्या स्वरुपाचा रुपांतरीत कायदा बनविण्याची गरज आहे. असंसी देव मानत असे. परंतु आजही त्याबाबत कायदे जुने होते व जुन्याच कायद्याचा वापर करुन आजच्या स्रिया पतीला सोडून पतीच्या घरुन निघून माहेरी जात होत्या. आरोप लावत होत्या. कारण त्यांना घरकामाचा कंटाळा येत होता. शिवाय त्यांना माहीतच होते की समजा मी वडिलांच्या घरी बसूनही राहिले तरी माझा उदरनिर्वाह पतीच्या कडून मिळणाऱ्या खावटीने चालेल. मला काम करण्याची कोणतीच गरज नाही.
         अशा बऱ्याच स्रिया होत्या की ज्या अशाच स्वरुपानं वागून पतीला त्रास देत होत्या. त्या नावापुरता विवाह करीत होत्या. अन् विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी ताबडतोब पतीला सोडून पतीच्या घरुन निघून जावून खावटी व घटस्फोटाचा अर्ज करीत होत्या. त्यातल्यात्यात त्या आपल्या माहेरी ऐषआरामाचं जीवन जगत होत्या. आज खावटीच्या व घटस्फोटाच्या खटल्यात याच खावटीप्रकरणातून वाढ झाली होती. म्हणूनच देवला वाटत होतं की आज काळ बदलल्यामुळं सरकारनं कायद्यात सुधारणा करुन नवीन कायदे बनवावेत. त्यात खावटी कलम टाकूच नये. खावटी जर नसेल तर शक्यतोवर कोणीच पतीला सोडून माहेरी जाणार नाही. खावटी मागणार नाही व खावटीमुळे आज जे घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे. ते प्रमाणही नियंत्रीत करता येईल. 
           देवचं तसा विचार करणं बरोबर होतं. कारण खावटी व हुंड्यामुळंच खरंतर खटले निर्माण होत होते व त्या खटल्यांचे प्रमाणही वाढले होते. त्याच्या संसारातही खावटी व हुंड्यामुळंच वाद निर्माण झाला होता. जर खावटी नसती व हुंडाही नसता तर देवची पत्नी मंजू त्याला सोडूनच गेली नसती.
          देव तिच्यापासून मोकळा झाला होता. तो तिच्यापासून मोकळा झाला असला तरी आजही तो गुंतूनच होता विवाह स्वरुपानं. शिवाय दुःखीही. त्याला दुःख होतं विवाहाचं. तो जरी मंजूपासून मोकळा झाला होता, विवाहाच्या बंधनातून घटस्फोट घेतल्यानं. परंतु तो घटस्फोट जायज नव्हता. कारण तो समाजातील दोन चार लोकांच्या साक्षीनं झालेला घटस्फोट होता. ज्याला कायद्याची मान्यता नव्हती. त्यातच कधी त्याची पत्नी म्हणायची की आपण राजरोषपणाचा विवाह करु. तेव्हा त्याला स्वतःच्या कर्तृत्वावर वाईट वाटत असे. कारण त्यानं करुणाला तिच्यासोबत विवाह करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु ते आश्वासन त्यानं पाळलं नव्हतं. ते आश्वासन त्याला पाळताच आलं नव्हतं. त्यानं करुणासोबत राजरोषपणानं विवाहही केला असता. परंतु आपण असा विवाह केल्यास कायद्यात अडकू, असं त्याला वाटत होतं. तेच दुःख त्याला आज सतावत होतं व त्याच दुःखानं त्याला आजपर्यंतच्या आयुष्यात सतावलं होतं. कारण त्याचे हात कायद्यानं बांधले होते. हिंदू विवाह कायद्यानुसार तो पहिल्या विवाहाचा घटस्फोट झाल्याशिवाय दुसरा विवाह करु शकत नव्हता. मात्र तिनं त्यानंतर अनेक विवाह केले व आज तिनं जो विवाह केला होता. तो मुस्लीम व्यक्तीशी केला होता. ज्या समाजात विवाह म्हणजे एकच पती करणे नव्हते तर असे कितीतरी पती तिला करता येत होते. तिनं धर्माचाच फायदा घेवून अनेक विवाह केले होते. तिनं मुस्लीम धर्मात विवाह करुन आपला धर्मही बदलवला होता.