कविता...दु:ख
कधी कधी दु:ख असतं, सखोल आणि सत्य..
पण तुम्ही त्यातून सुटत नाही, ते तुमच्यासोबत असतं..
जखमांनी भारावलेलं, वाटतं तुम्हास एकटं..
पण वेळेपुरती प्रार्थना, परतवतं घरटं..
जीवनचक्र चालत राहतं, नसतं त्यात काळं.
कधी कधी सुख हरवतं, ते रेंगाळतं जाळं.
सगळं काही छान तरी काहीतरी हरवतं..
सुखाच्या आठवणी चुंबन घेत राहतं..
ह्रदयाचं दु:ख कुणी भरू शकत नाही..
तुमचीच शक्ति ह्रदयास वर्धन करीत राही..
तेंव्हा अंतरातील जखमा, विसरूनी जावे पुढे..
जीवनप्रवास नेईन जेथे, जावे तेथे तेथे..
मूळ कविता ईंग्रजीत- निधी वासानी
अनुवाद- कवि प्रकाश राऊत, अमरावती
दिनांक 28.03.2026
***********