वेल इवलीशी असली तरी आधार भक्कम असेल तर ती आभाळाची उंची गाठते. म्हणून आधार असा असावा जो आपल्याला उंची गाठायला शिकवेल.
उच्च विचार आणि संस्कार, खरी मैत्री ज्यांच्या अंगी असतात अशीच माणसे कुणाचा तरी आधार होतात.
या जगात प्रत्येकाला खरा आधार कोणाचा असेल तर तो अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांचां !! फक्तं स्वामींचे दर्शन झाले तरी "भिऊ नकोश मी तुझ्या पाठीशी आहे" या आशीर्वादाचा आधार मिळतो आणि आपले जीवनक्रमण सुखकर होते .
आज स्वामींची पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी साष्टांग दंडवट!!"