कविता
क्षण..
आयुष्यात क्षण येत असतात
जात असतात
कधी आनंदाचे
कधी दुःखाचे
कधी प्रेमाचे
तर कधी विरहाचे
निराशेचे क्षण तर नेहेमीच येत असतात
खरे तर क्षणा क्षणांनी आपले आयुष्य बनत असते
कोणी म्हणतात कोणत्याही भावनेची अनुभूती तर क्षणभर असते
पण तसे नसते
आयुष्यात आलेले सगळेच क्षण नेहेमीच आपल्या अवती भवती असतात
आयुष्याच्या शेवटच्या दिवसात हेच क्षण आठवत राहतात
आणि त्यांचे महत्त्व आपल्याला जाणवून देतात
कधी ओंजळ उघडताच सुखाचे आनंदाचे क्षण अलगद येऊन बसतात
हे क्षण थोडा वेळ असले तरी आपले मोहक रंग हातावर सोडून जातात
कधी अनपेक्षित रीत्या दुःखाचे निराशेचे क्षण ओंजळीत येतात
आगदी बळजबरीने आपली ओंजळ उघडून...
या क्षणांना आपण नाही म्हणुच शकत नाही
अशा वेळी मन खंबीर नाही केले
तर हेच क्षण आयुष्भर आपला पिच्छा पुरवतात
असे हे क्षण आयुष्याच्या सोबत वावरणारे
आणि आयुष्यभर पुरणारे